शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गणवेशाविनाच

By admin | Updated: July 14, 2017 00:14 IST

देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून पहिले गणवेश खरेदीची पावती घ्या, नंतरच पैसे द्या, अशा जी.आर. परिपत्रकामुळे शाळा सुरू होवून १६ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक गावातील विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत येत आहेत.पारदर्शक कारभार हे ब्रिद घेवून राज्य सरकार सध्या काम करीत आहे. पारदर्शी कारभारामुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा सरकारने अनेकदा दावा केला आहे. हा दावा खराही असेल. मात्र या कारभाराचा फटका जिल्हा परिषद अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यासह जिल्हा परिषद व महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु जि.प. च्या शाळेत शिक्षणासाठी येणारे जवळजवळ सर्वच विद्यार्थी गरीब असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गणवेशाचे पैसे असतेच असे नाही. त्यामुळे अनेक पालक गणवेश खरेदी करीत नाहीत. परिणामी खरेदीची पावती त्यांना मिळत नाही आणि गणवेशाचे अनुदानही मिळत नाही. या शासनाच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचितगणवेशाची रक्कम मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी परिश्रम घेत विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले. परंतु जेमतेम परिस्थिती असलेले पालक अद्याप गणवेश खरेदी करू शकले नाही. त्यामुळे या पारदर्शी कारभाराला या गरिबांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जि.प. व मनपा शाळेतील हजारो विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत.अगोदर गणवेश खरेदी करा; नंतर पैसे घ्याशासनाच्या परिपत्रकामुळे गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाकडून खात्यात आली तरी विद्यार्थ्यांना ती लगेच दिली जात नाही. पालकांनी प्रथम स्वत:च्या पैशाने गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखविणे अनिवार्य आहे. तेव्हाच ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येणार आहे.