शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

विद्यार्थी गणवेशाविनाच

By admin | Updated: July 14, 2017 00:14 IST

देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून पहिले गणवेश खरेदीची पावती घ्या, नंतरच पैसे द्या, अशा जी.आर. परिपत्रकामुळे शाळा सुरू होवून १६ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक गावातील विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत येत आहेत.पारदर्शक कारभार हे ब्रिद घेवून राज्य सरकार सध्या काम करीत आहे. पारदर्शी कारभारामुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा सरकारने अनेकदा दावा केला आहे. हा दावा खराही असेल. मात्र या कारभाराचा फटका जिल्हा परिषद अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यासह जिल्हा परिषद व महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु जि.प. च्या शाळेत शिक्षणासाठी येणारे जवळजवळ सर्वच विद्यार्थी गरीब असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गणवेशाचे पैसे असतेच असे नाही. त्यामुळे अनेक पालक गणवेश खरेदी करीत नाहीत. परिणामी खरेदीची पावती त्यांना मिळत नाही आणि गणवेशाचे अनुदानही मिळत नाही. या शासनाच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचितगणवेशाची रक्कम मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी परिश्रम घेत विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले. परंतु जेमतेम परिस्थिती असलेले पालक अद्याप गणवेश खरेदी करू शकले नाही. त्यामुळे या पारदर्शी कारभाराला या गरिबांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जि.प. व मनपा शाळेतील हजारो विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत.अगोदर गणवेश खरेदी करा; नंतर पैसे घ्याशासनाच्या परिपत्रकामुळे गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाकडून खात्यात आली तरी विद्यार्थ्यांना ती लगेच दिली जात नाही. पालकांनी प्रथम स्वत:च्या पैशाने गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखविणे अनिवार्य आहे. तेव्हाच ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येणार आहे.