शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

विद्यार्थी गणवेशाविनाच

By admin | Updated: July 14, 2017 00:14 IST

देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहे. मात्र यातील काही निर्णयामुळे गरीब जनतेसह विद्यार्थीही भरडले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून पहिले गणवेश खरेदीची पावती घ्या, नंतरच पैसे द्या, अशा जी.आर. परिपत्रकामुळे शाळा सुरू होवून १६ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक गावातील विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत येत आहेत.पारदर्शक कारभार हे ब्रिद घेवून राज्य सरकार सध्या काम करीत आहे. पारदर्शी कारभारामुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा सरकारने अनेकदा दावा केला आहे. हा दावा खराही असेल. मात्र या कारभाराचा फटका जिल्हा परिषद अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यासह जिल्हा परिषद व महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. परंतु जि.प. च्या शाळेत शिक्षणासाठी येणारे जवळजवळ सर्वच विद्यार्थी गरीब असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे गणवेशाचे पैसे असतेच असे नाही. त्यामुळे अनेक पालक गणवेश खरेदी करीत नाहीत. परिणामी खरेदीची पावती त्यांना मिळत नाही आणि गणवेशाचे अनुदानही मिळत नाही. या शासनाच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचितगणवेशाची रक्कम मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी परिश्रम घेत विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडले. परंतु जेमतेम परिस्थिती असलेले पालक अद्याप गणवेश खरेदी करू शकले नाही. त्यामुळे या पारदर्शी कारभाराला या गरिबांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जि.प. व मनपा शाळेतील हजारो विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत.अगोदर गणवेश खरेदी करा; नंतर पैसे घ्याशासनाच्या परिपत्रकामुळे गणवेशाची रक्कम मुख्याध्यापकाकडून खात्यात आली तरी विद्यार्थ्यांना ती लगेच दिली जात नाही. पालकांनी प्रथम स्वत:च्या पैशाने गणवेश खरेदी करून त्याची पावती मुख्याध्यापकांना दाखविणे अनिवार्य आहे. तेव्हाच ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यात येणार आहे.