शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:21 IST

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा गोंधळ : मोफत पुरवठ्याचा बोजवारा

सुरेश रंगारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविली जातात. शासनाची यंत्रणा शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच पुढील सत्राची विद्यार्थ्यांची संभाव्य संख्येची माहिती शाळांकडून मागविल्या जाते. त्यानुसार पुस्तकांची छपाई केली जाते. त्यानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा अपेक्षित आहे. २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्यास आठवडा पुर्ण होत आहे. तरीही विद्यार्थ्यांना पुर्ण विषयाचे पुस्तके मिळाले नाही. केंद्रामध्ये पुस्तके पाठविण्यात आले. मात्र त्यात पुस्तकांचा पुरवठा अपुरा होता.पुस्तके वाटप करतानाही मागणीनुसार वाटप न करता काही शाळांना जास्तीचे तर काही शाळांना कमी पुस्तकांचे वाटप केल्याने संस्थेनुसार पुस्तके विद्यार्थ्यांना मिळू शकले नाही व अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले. काही विद्यार्थी जुन्या पुस्तकांचा वापर सुरू केला आहे. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाची पुस्तके बदलविण्यात आली असल्याने जुने पुस्तके वापरू शकत नाही व पुस्तके बाजारात विक्रेत्याकडे उपलब्ध नाही. परिणामी आठवीचे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेत जात आहेत. पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.बल्लारपूर तालुक्यात बारा हजार पुस्तकांची मागणीबल्लारपूर तालुक्यात १२ हजार पुस्तकांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार मराठी, हिन्दी, उर्दू, तेलगु माध्यमांची तसेच सेमी मराठी, हिंदी, उर्दू व तेलगु माध्यमाची पुस्तके पुरवठा करण्यात आला. मात्र वाटपात सावळागोंधळ झाल्यामुळे व शिक्षकांची अधिकचे पुस्तके घेतल्याने विद्यार्थ्यांना विषयानुसार पुस्तके मिळू शकली नाहीत.गणवेशाचीही प्रतीक्षाशासनाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम अन्वये वर्ग १ ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ६०० रू. अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रावधान आहे. शाळा सुरू झाल्यापुस्तके प्राप्त होत आहेत. मात्र विद्यार्थी व पालक गणवेश घेण्यासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने नवीन गणवेश खरेदी केल्या गेला नाही. विद्यार्थी शाळेत रंगीत कपड्यात येत आहेत.तालुक्यातील शाळेच्या मागणीनुसार पुस्तकांचा साठा केंद्रस्तरावर पाठविण्यात आला. मात्र केंद्रातून पुस्तक वाटपात गोंधळ उडाला. काही शाळांना विषयांकीत तसेच पुरेसे पुस्तके प्राप्त झाली नाहीत. आढावा बैठक घेवून त्यात जास्त पुस्तके प्राप्त शाळातून परत मागवून कमी गेलेल्या शाळांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल.-शोभा मडावी, गटशिक्षणाधिकारी,बल्लारपूर पंचायत समिती.