शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:21 IST

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा गोंधळ : मोफत पुरवठ्याचा बोजवारा

सुरेश रंगारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद, अनुदानित खासगी शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजना सुरू केली. परंतु वितरण व्यवस्थेतील ढिसाळ प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयांची पुस्तके अजूनही प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शाळांतील अनेक विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके शासनाकडून पुरविली जातात. शासनाची यंत्रणा शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच पुढील सत्राची विद्यार्थ्यांची संभाव्य संख्येची माहिती शाळांकडून मागविल्या जाते. त्यानुसार पुस्तकांची छपाई केली जाते. त्यानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा अपेक्षित आहे. २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्यास आठवडा पुर्ण होत आहे. तरीही विद्यार्थ्यांना पुर्ण विषयाचे पुस्तके मिळाले नाही. केंद्रामध्ये पुस्तके पाठविण्यात आले. मात्र त्यात पुस्तकांचा पुरवठा अपुरा होता.पुस्तके वाटप करतानाही मागणीनुसार वाटप न करता काही शाळांना जास्तीचे तर काही शाळांना कमी पुस्तकांचे वाटप केल्याने संस्थेनुसार पुस्तके विद्यार्थ्यांना मिळू शकले नाही व अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहिले. काही विद्यार्थी जुन्या पुस्तकांचा वापर सुरू केला आहे. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाची पुस्तके बदलविण्यात आली असल्याने जुने पुस्तके वापरू शकत नाही व पुस्तके बाजारात विक्रेत्याकडे उपलब्ध नाही. परिणामी आठवीचे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेत जात आहेत. पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.बल्लारपूर तालुक्यात बारा हजार पुस्तकांची मागणीबल्लारपूर तालुक्यात १२ हजार पुस्तकांची मागणी करण्यात आली. मागणीनुसार मराठी, हिन्दी, उर्दू, तेलगु माध्यमांची तसेच सेमी मराठी, हिंदी, उर्दू व तेलगु माध्यमाची पुस्तके पुरवठा करण्यात आला. मात्र वाटपात सावळागोंधळ झाल्यामुळे व शिक्षकांची अधिकचे पुस्तके घेतल्याने विद्यार्थ्यांना विषयानुसार पुस्तके मिळू शकली नाहीत.गणवेशाचीही प्रतीक्षाशासनाच्या सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम अन्वये वर्ग १ ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ६०० रू. अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रावधान आहे. शाळा सुरू झाल्यापुस्तके प्राप्त होत आहेत. मात्र विद्यार्थी व पालक गणवेश घेण्यासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने नवीन गणवेश खरेदी केल्या गेला नाही. विद्यार्थी शाळेत रंगीत कपड्यात येत आहेत.तालुक्यातील शाळेच्या मागणीनुसार पुस्तकांचा साठा केंद्रस्तरावर पाठविण्यात आला. मात्र केंद्रातून पुस्तक वाटपात गोंधळ उडाला. काही शाळांना विषयांकीत तसेच पुरेसे पुस्तके प्राप्त झाली नाहीत. आढावा बैठक घेवून त्यात जास्त पुस्तके प्राप्त शाळातून परत मागवून कमी गेलेल्या शाळांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल.-शोभा मडावी, गटशिक्षणाधिकारी,बल्लारपूर पंचायत समिती.