शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:02 IST

विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला.

ठळक मुद्देबेलोरा शाळेचे समायोजन : शाळेच्या वेळेत विद्यार्थी बसतात मंदिरात

विनायक येसेकर।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला. मात्र शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी व पालकांनी मुलांना जेना येथील शाळेत पाठविण्यास नकार दिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत.शिक्षणापासून कोणतेही मुले वंचित राहता कामा नये, यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. अशातच शासनाने ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. त्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन जवळपास असलेल्या गावातील शाळेत करण्याचे पत्रसुद्धा काही शाळांना देण्यात आले आहे. तालुक्यातील बेलोरा या गावातील शाळेला असेच पत्र मिळाल्याने या शाळेचे पूनर्वसन तीन किमी अंतरावर असलेल्या जेना या शाळेत करण्यात आले. त्यामुळे येथील शिक्षकांनी १९ डिसेंबरला बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले व विद्यार्थ्यांना समायोजन झालेल्या जेना येथील शाळेत पाठविण्यास पालकांना सांगितले.१ ते ४ वर्ग असलेल्या बेलोरा शाळेतील विद्यार्थी लहान असल्याने येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांना समायोजन झालेल्या शाळेत पाठविण्यास नकार दिला व येथील संवर्ग विकास अधिकारी व शिक्षण विभागाला निवेदन देवून ही शाळा या गावातच कायमस्वरूपी ठेवण्यात यावी किंवा विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. या शाळेला कुलूप ठोकून जेना येथील शाळेत शिक्षक रूजूसुद्धा झाले. परंतु बेलोरा येथील विद्यार्थ्यांची शाळा मात्र बंद झाली आहे.पालकवर्ग शेतीच्या मजुरीसाठी जात असतात. मुलांना शाळेत पोहचविण्यासाठी किंवा त्यांना शाळेतून घेऊन येण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून येथील मुले बेलोरा येथील मंदिरात शाळेच्या वेळेपर्यंत बसत आहे. त्या मुलांकडे येथील शाळा व्यवस्थापन समिती लक्ष देण्याचे काम करीत आहे. शासनाच्या या शाळा समयोजन निर्णयाचा फटका बेलोरा या गावाला बसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे तुर्तास दिसून येत आहे.