शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आवास योजनेनंतरही ‘निवासा’साठी संघर्ष

By admin | Updated: October 22, 2015 00:54 IST

हक्काचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक जण रंगवितो, अनेकांची स्वप्न वास्तव्यास उतरतात तर काहीची स्वप्न ही स्वप्नच बनून राहतात.

अनेकांना योजनेचा लाभ नाही : गरीब असूनही दारिद्र्यरेषेपासून वंचितगुंजेवाही : हक्काचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक जण रंगवितो, अनेकांची स्वप्न वास्तव्यास उतरतात तर काहीची स्वप्न ही स्वप्नच बनून राहतात. मुलांनी हाकलून दिल्यामुळे काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो तर आर्थिक परिस्थितीमुळे हतबल होवून काहीना बेघर व्हावे लागते. शासकीय ‘आवास’ योजनादेखील वशिलेअभावी ‘निवास’ देत नसल्याने अनेकांना झोपडीवजा दहा बाय बाराच्या खोलीत जीवाचा गाडा हाकावा लागत आहे. एकंदरीत ‘निवासा’साठीचा संघर्ष प्रत्येक घटकांसाठी कायम असल्याचे चित्र आहे.अन्न, वस्त्र व निवारा मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून सर्वाच्याच परिचित आहेत. एकीकडे श्रीमंत वर्ग अती श्रीमंतीच्या दिशेने झेप घेत आहे. तर दुसरीकडे गरीब वर्ग दारिद्र्याच्या ओझ्याखाली दबला जात आहे. जवळपास २५ टक्के जनता जीव मुठीत घेवून वाटचाल करीत आहे. सर्वांना ‘निवास’ असावे, मात्र लाभार्थ्यांना निवासाचा लाभ देण्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून जागतिक स्तरावर ३ आॅक्टोबर रोजी ‘निवास दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीने निवासाचा प्रश्न गहन बनता चालला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, निरक्षर कुटुंबात लोकसंख्या वाढीचे प्रमाण अधिक असल्याने जे गरीब कुटूंब दहा बाय बाराच्या झोपडीवजा घरात राहत होती. त्यांना कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्याने अतिक्रमित जागेवर झोपड्या करून राहावे लागत असल्याचे बोलके चित्र पाहावयास मिळते. ‘हम दो-हमारा एक’ चा नारा दिला जातो. तरीदेखील झोपडपट्टी भागातील लोकसंख्या वाढत आहे. साहजीकच ग्रामीण भागातील जनता खुल्या जागेच्या परिसरात झोपड्या बांधून आपकी उपजीविका करताना दिसतात. लोकसंख्या वाढत असल्याने ‘निवासा’ विना उघड्यावर पाल मांडून राहण्याची वेळ काहीवर येत आहे.मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवीत असतात. परंतु अठराविश्व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या कुटुंबाला दारिद्रय रेषेपासून दूर राहावे लागत असेल, भूमिहीन शेतमजूर यांनाही बीपीएलपासून वंचित राहावे लागत असेल तर त्याच्यासारखे दुर्दैव कोणते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आवास योजनेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो घरकूल मंजूर होतात. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीदेखील अनेकांना राहायला व्यवस्थित घर नसल्याची स्थिती ग्रामीण भागात आहे. सिंदेवाही तालुक्यात ज्यांच्याकडे सुसज्ज घर आहे, त्यांच्याकडे आवास योजनेचे निवास असल्याची व एकाच घराला पूर्ण बिल दिल्यानंतरही त्याच घराला दोनदा बिल काढल्याचे व धनादेशाची उचल केल्याची धक्कादायक माहिती आहे. शासनाने अठराविश्व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या व्यक्तींना दारिद्र्यरेषेपासून वंचित ठेवून त्यांना मरणयातना भोगण्यास भाग पाडत आहे. (वार्ताहर)