शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

प्रहारचे इरई नदीवर धरणे आंदोलन

By admin | Updated: December 22, 2016 01:40 IST

विजेच्या खांबामुळे विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी,

 कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी : नदी पात्रात उभे राहून आंदोलन चंद्रपूर: विजेच्या खांबामुळे विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इरई नदीच्या पात्रामध्ये उभे राहून बुधवारी धरणे आंदोलन केले. २२ एप्रिल २०१६ रोजी रमेश पांडुरंग जाधव (२३) या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. सदर घटनेला सात महिन्यांचा कालावधी लोटूनही या युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन सादर करण्यात आली. मात्र नुकसानभरपाई देण्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. मृत रमेश जाधव याचे वडील ७० वर्षांचे असून डोळ्यांनी अंध आहेत. एक बहिण विधवा असून दोन मुले आहेत. यांचा सांभाळ कसा करायाचा असा प्रश्न जाधव यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीयांना १५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच मनपा प्रशासन तथा सबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटेनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यापूर्वी प्रहार संघटनेच्या वतीने अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना तिनदा निवेदन दिले. आर्थिक मदत न दिल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला. मात्र कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे प्रहारतर्फे आंदोलन केले. यावेळी अध्यक्ष पप्पू देशमुख, फिरोज खान पठाण, अभय येरगुडे, राहुल दडमल, हर्षल सैरम, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, वैभव लेडांगे, सतिष खोब्रागडे, पाझारे व जाधव आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)