वरोरा : शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा व सुकाणू समितीतर्फे सोमवारी रत्नमाला चौक वरोरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा प्रहार जनशक्ती पक्षाकडून निषेध करण्यात आला.शेतकºयांच्या संप व आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली.़ मात्र घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत. हा सगळा दिशाभूल करण्याचा प्रकार त्वरित थांबवून शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे, शेतमालाला भाव देण्यात यावा, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, शेतकºयांना ६० वर्षे वयानंतर किमान तीन हजार रुपये पेंशन देण्यात यावी, शेतकºयांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, सुकाणू समितीने केलेल्या मागणी पत्रकातील ३० मागण्या मान्य कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणू समितीतर्फे वरोरा येथील रत्नमाला चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने शेतकरीपूत्र रस्त्यावर उतरून भाजपा सरकार विरोधात नारेबाजी करीत रत्नमाला चौकात पोहचले. जवळपास ३० मिनिटे चाललेल्या चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. हे आंदोलन प्रहारचे संस्थापक आ. बच्चू कडू व विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुका अध्यक्ष अमोल डुकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रहार सेवक सुरज घुमे, गणेश उराडे, पिंटू वासेकर, निखिल विरूटकर, आशिष झिले, चेतन राजूरकर, गोविंदा खडसे, राकेश पिंपळकर , सुशील पिंपळकर , वैभव पिंपळकर ,प्रशांत बदकी, आकाश समर्थ सचिन वाढई, संतोष बुटले, विकास डुकरे, विजू ढोके, शरद बदकी आदी उपस्थित होते.
सरसकट कर्जमाफीसाठी प्रहारचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:47 IST
शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे,
सरसकट कर्जमाफीसाठी प्रहारचा चक्काजाम
ठळक मुद्देरस्त्यावर वाहनाच्या रांगा : शेतकºयांची उपस्थिती