शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:06 IST

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : जिल्हाधिकाºयांमार्फत राज्यपालांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.सदर मोर्चासाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधव येथील जिल्हा कारागृहातील शहीद भूमीजवळ एकत्रित आले. त्यानंतर हा मोर्चा गांधी चौक, जयंत टॉकीज चौक, प्रियदर्शिनी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गोंडवाना विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, कोलमाईन्समध्ये गेलेल्या आदिवासींच्या जमिनी व इतर लोकांच्या जमिनी संबंधित शेतकºयास परत देण्यात याव्या, जल, जंगल, जमिनीवर स्थायी आदिवासी लोकांच्या अधिकार देण्यात यावे, आदिवासी जमीन विक्रीचा कायदा कडक करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करावी, जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक सभागृह विभागामार्फत बांधण्यात यावे, ६ जुलै २०१७ च्या सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची विनाविलंब अंमलबजावणी करावी, १५ जून १९९५ व २१ आॅक्टोबर २०१५ हे शासन निर्णय परिपत्रक तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावे, पेसा कायद्याची अंमलबजावणी प्रभावाने करावी, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.त्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांमार्फत महामहीम राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले, अशी माहिती प्रा. धीरज शेडमाके, मनोज आत्राम यांनी दिली. मोर्चात आदिवासींच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.सांकेतिक मूक सत्याग्रहअखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस तथा ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ३३ अन्यायग्रस्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंयत जटपुरा गेट येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याखाली सांकेतिक मूक सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम हा अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास धकाते व महासचिव विजय सोनकुसरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सत्याग्रहात रवी उमाटे, किरण खाडीलकर, नरेंद्र बैरम, कविता जुनोनकर, दीपक खाडीलकर, विश्वास निमजे, विनोद धकाते, शितल सोरते, अनिता बैरम, नितीमा नंदूरकर, लता चिमूरकर, रश्मी नंदूरकर, रूपेश धकते, स्मिता धकाते, वसुधा सोरते, प्रगती महतकर व समाज बांधव सहभागी झाले होते.