शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:10 IST

वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे.

ठळक मुद्देघरांना पडत आहेत भेगा : नागरिकांच्या जीवाशी खेळ, वेकोलि लक्ष देईना, प्रशासनाने तरी द्यावे

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे. परंतु याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. या परिसरात दगडी कोळशाचे जाळे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्याठिकाणी कोळसा खाणी तयार केल्या. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या कोळसा खाणी गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून वेळी-अवेळी ही ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने खदानीलगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. ब्लास्टिंगमुळे शेतातील बोअरवेल पुर्णपणे निकामी झाल्या आहेत. कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाळ्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.वेकोलिने गावकऱ्यांचा न संपणारा जीवन संघर्ष सुरू केला आहे. कोळसा खाणींची ही धग विनाकारण नागरिकांच्या माथी मारली जात आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांनी त्यांचे आयुष्यच हादरले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिने लादलेल्या समस्यांवर प्रशासनाच्या कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधींना गावकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता आले नाही, हे कोळसा खाण परिसरातील गावातील नागरिकांचे दुर्दैव आहे.अन्यायाला वाचा फोडणार कोण?कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरातील गावकऱ्यांना वेकोलिचा मनस्ताप सहन करावा लागतो. गावकऱ्यांचा वेकोलिच्या दुष्परिणामांशी रोजचाच संघर्ष असल्याने नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.३० वर्षांपासून गावकरी त्रस्तगेल्या ३० वर्षांपासून वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. परंतु आजपर्यंत यावर प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे. वेकोलितून दिवस रात्र चालणाऱ्या कोळसा वाहतुकीने रस्ते पूर्णत: काळवंडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा सर्व वेकोलितील दुष्परिणामांचा फटका गावकऱ्यांना बसत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Blastस्फोट