शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:10 IST

वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे.

ठळक मुद्देघरांना पडत आहेत भेगा : नागरिकांच्या जीवाशी खेळ, वेकोलि लक्ष देईना, प्रशासनाने तरी द्यावे

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे. परंतु याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. या परिसरात दगडी कोळशाचे जाळे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्याठिकाणी कोळसा खाणी तयार केल्या. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या कोळसा खाणी गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून वेळी-अवेळी ही ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने खदानीलगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. ब्लास्टिंगमुळे शेतातील बोअरवेल पुर्णपणे निकामी झाल्या आहेत. कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाळ्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.वेकोलिने गावकऱ्यांचा न संपणारा जीवन संघर्ष सुरू केला आहे. कोळसा खाणींची ही धग विनाकारण नागरिकांच्या माथी मारली जात आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांनी त्यांचे आयुष्यच हादरले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिने लादलेल्या समस्यांवर प्रशासनाच्या कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधींना गावकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता आले नाही, हे कोळसा खाण परिसरातील गावातील नागरिकांचे दुर्दैव आहे.अन्यायाला वाचा फोडणार कोण?कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरातील गावकऱ्यांना वेकोलिचा मनस्ताप सहन करावा लागतो. गावकऱ्यांचा वेकोलिच्या दुष्परिणामांशी रोजचाच संघर्ष असल्याने नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.३० वर्षांपासून गावकरी त्रस्तगेल्या ३० वर्षांपासून वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. परंतु आजपर्यंत यावर प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे. वेकोलितून दिवस रात्र चालणाऱ्या कोळसा वाहतुकीने रस्ते पूर्णत: काळवंडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा सर्व वेकोलितील दुष्परिणामांचा फटका गावकऱ्यांना बसत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Blastस्फोट