शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:10 IST

वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे.

ठळक मुद्देघरांना पडत आहेत भेगा : नागरिकांच्या जीवाशी खेळ, वेकोलि लक्ष देईना, प्रशासनाने तरी द्यावे

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने शक्तीशाली ब्लास्टिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे घरांना तडे जात आहे. परंतु याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. या परिसरात दगडी कोळशाचे जाळे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्याठिकाणी कोळसा खाणी तयार केल्या. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या कोळसा खाणी गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येते. नियम धाब्यावर बसवून वेळी-अवेळी ही ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने खदानीलगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घरांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. ब्लास्टिंगमुळे शेतातील बोअरवेल पुर्णपणे निकामी झाल्या आहेत. कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाळ्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.वेकोलिने गावकऱ्यांचा न संपणारा जीवन संघर्ष सुरू केला आहे. कोळसा खाणींची ही धग विनाकारण नागरिकांच्या माथी मारली जात आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांनी त्यांचे आयुष्यच हादरले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिने लादलेल्या समस्यांवर प्रशासनाच्या कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधींना गावकºयांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता आले नाही, हे कोळसा खाण परिसरातील गावातील नागरिकांचे दुर्दैव आहे.अन्यायाला वाचा फोडणार कोण?कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरातील गावकऱ्यांना वेकोलिचा मनस्ताप सहन करावा लागतो. गावकऱ्यांचा वेकोलिच्या दुष्परिणामांशी रोजचाच संघर्ष असल्याने नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.३० वर्षांपासून गावकरी त्रस्तगेल्या ३० वर्षांपासून वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. परंतु आजपर्यंत यावर प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे. वेकोलितून दिवस रात्र चालणाऱ्या कोळसा वाहतुकीने रस्ते पूर्णत: काळवंडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा सर्व वेकोलितील दुष्परिणामांचा फटका गावकऱ्यांना बसत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Blastस्फोट