शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांविरूद्ध संघर्ष करण्याची बंजारा समाजात ताकद -संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:49 IST

संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे.

ठळक मुद्देबंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे. मात्र हा संघर्ष करताना आमच्यातील सर्व संघटनांचा वैचारिक एकोपा कायम असला पाहिजे. बंजारा म्हणून एका छताखाली वैचारिक समेट झाली पाहिजे. आपले वैचारिक एकमत झाले की, संघर्ष करायला हा समाज कायम तयार असतो. तो आपला बाणा असून समाजात ती उपजत ताकद आहे, असा आशावाद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चंद्रपुरात रविवारी व्यक्त केला.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या विदर्भ प्रदेशच्या वतीने चंद्रपूर येथील शकुंतला फर्म, येथे आयोजित कार्यकर्ता शिबिर व राज्यस्तरीय मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या विविध क्षेत्रातील समाजबांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या ऐतिहासिक व सध्यास्थिती मांडली. आपला बाणा संघर्षाचा आहे. देशात ८ कोटी असणारा हा समाज महाराष्ट्रातही एक मोठी शक्ती म्हणून उभा आहे. कोणत्याही राजकीय प्रवाहात काम करीत असाल तरी जेव्हा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचा प्रश्न असेल तेव्हा सर्व शकले गळून पडली पाहिजे. समाजातील नेत्यांनी, आणि विशेषत: युवकांनी संघटन शक्तीच्या बळावर पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री राजूसिंग नाईक, आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंग तिलावत, राष्ट्रीय कार्याअध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, विमुक्त व भटक्या जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य श्रावणसिंगजी राठोड, मेहताबसिंग नाईक, अ‍ॅड.गोविंद राठोड, तुकाराम पवार, मोहन राठोड, डॉ. तुषार राठोड, अशोक चव्हाण, एन.टी. जाधव, बद्रीप्रसाद चव्हाण, पंकज पवार, भारत राठोड, अ‍ॅड जगदीश पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष टी.के.पवार, पंकज तुकाराम पवार, धुमसिंग जाधव, गोवर्धन चव्हाण, लखपती जाधव, प्राचार्य लोपचंद नामदेव राठोड यांनी केले होते. या मेळाव्याला बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.