शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रस्त्यावर बाजार अन् गावाला अतिक्रमणाचा आजार

By admin | Updated: January 27, 2015 23:30 IST

चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या

बाबुराव परसावार - सिंदेवाहीचंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे करण्यात आली नाहीत, हे या नगराचे दुर्दैव आहे.सिंदेवाही हे गाव चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असून तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक पुढाऱ्याकडून,त्यांच्या कार्यकर्त्याकडून अडचणी, तक्रारी व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे गावाच्या विकासामाध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. गावातील अरुंद रस्ते, रस्त्यावर खोलगट खड्डे, कचऱ्याचे ढिग, सांडपाण्याची गैरसोय यामुळे गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाळ्यात बाजार चौकातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावरुन दुचाकी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. जुन्या बसस्थानकापासून गावात प्रवेश करताना दोन फूट गल्लीतून यावे लागते. समाज मंदिराची दुर्दशासिंदेवाहीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भर घालणारे येथील समाज मंदिर सध्या दुर्दशेत उभे आहे. सिंदेवाही ग्रामपंचायतीने १९८४ मध्ये समाज मंदिर बांधले. त्यानंतर आमदार निधीतून पाच लाख रुपये खर्चून सभागृह व त्यावर शेड बांधण्यात आले. त्यामुळे या समाज मंदिरात सभा, संमेलन, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. सभागृहावरील सिमेंट शेड ठिकठिकाणी तुटलेले असून पावसाळ्यात संपूर्ण सभागृह गळते. व्यासपीठावरील खोलीचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत, समाज मंदिरात विद्युत व्यवस्था नाही. पूर्वी लग्न समारंभ व नाटकाकरिता समाज मंदिर किरायाने दिल्या जात होते. परंतु व्यवस्था नसल्यामुळे या समाज मंदिरात होणारे कार्यक्रम बंद झाले आहेत. आठवडी बाजार गैरसोयीचादर सोमवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजाराच्या विकासाची व सुधारण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. सध्या रस्त्यावर भरत असलेल्या आठवडी बाजारात अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. बाजार रस्त्यावर भरत असल्यामुळे रस्ते रहदारीकरिता अडचणीचे झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याची दुकाने असल्यामुळे ग्राहकांना बाजारात वस्तू व भाजीपाला खरेदी करणे कठीण होवून बसले आहे. आठवडी बाजारासाठी बाजार चौकात जागा होती. परंतु अतिक्रमणामुळे व शॉम्पिंग कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे आठवडी बाजाराची जागा संपुष्टातत आली. गावातील रस्त्यावर दुकाने थाटलेली असतात.