शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात आठवडी बाजार भरतो रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

चिमूर : चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या काळात आठवडी बाजार अस्तित्वात आला. अशाच प्रकारचा आठवडी ...

चिमूर

: चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या काळात आठवडी बाजार अस्तित्वात आला. अशाच प्रकारचा आठवडी बाजार चिमूर शहरात शुक्रवारी भरविण्यात येत आहे.

त्या काळात चिमुरात भरणारा बाजार हा बालाजी मंदिराच्या आवारात रिकाम्या जागेत भरायचा. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा व्याप वाढला. आजघडीला हाच बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यात येत आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगरपरिषद अस्तित्वात येवूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

जिल्हास्थळापासून १०० किमी अंतरावर असलेल्या चिमूर शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत १५ ते २० हजारांच्या घरात आहे. चिमूर तालुक्यात ९० ग्रामपंचायतींसह अडीचशे गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी चिमूर शहरात यावे लागते. त्यामुळे रोज या शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. नागरिकांच्या गरजेनुसार चिमूर शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ अस्तित्वात आली. असे असले तरी अनेक वर्षांपासून आठवडी बाजार रस्त्यावर भरवला जात आहे. मुख्य रस्त्यावर भरवण्यात येणाऱ्या बाजारामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

बॉक्स

बाजाराच्या लिलावातून लाखोंचा फायदा

आठवडी बाजाराच्या वार्षिक लिलावातून स्थानिक प्रशासनाला लाखो रुपयाचा महसूल जमा होतो. मात्र या महसुलातून व्यापाऱ्यांना व बाजारहाट करणाऱ्यांना लाईट, पाणी यासारख्यासुद्धा सुविधा पुरविण्यात येत नाही. त्यामुळे अंधार पडण्याच्या आतच व्यापाऱ्यांना दुकान बंद करावे लागते. मात्र यात महसुलाचा वापर कुठे होतो हा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांना भेडसावत आहे.

बॉक्स

नगरपालिकेने उपाययोजना कराव्या

नगर परिषदेची निर्मिती होऊन पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नगरपरिषदेकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र तत्कालीन सरपंच व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील बाजार तलावात भरवण्यास पुढाकार घेतला व बाजार तलावात भरवला. तर नगर परिषदनेसुध्दा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्ड भाड्याने घेऊन बाजार तिथे नेला. पण सुविधा नसल्याने पूर्ववत रोडवर बाजार आला. आता नगर परिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.