शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

By admin | Updated: May 26, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे.

मुंडे, महाजन मंत्रिद्वयांचे प्रतिपादन : सिंचन प्रकल्प व जलयुक्तचा आढावाचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बांधकामाधीन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.बुधवारी हे दोन्ही मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मंत्रिद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, बंटी भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व कार्यकारी अभियंता राजेश सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी अधीक्षक अभियंता एम.जे. शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी ना. महाजन यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा ३० ते ४० टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे ते म्हणाले.जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जलसंधारणाची कामे करताना शोषखड्डे, नदी पुनर्जीवन आदी कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रस्त्यांचा मोठा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. बैठकीत पाणी गुणवत्तेबाबत निरीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. बैठकीस जलसंपदा, जलसंधारण या विभागांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)