शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

By admin | Updated: May 26, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे.

मुंडे, महाजन मंत्रिद्वयांचे प्रतिपादन : सिंचन प्रकल्प व जलयुक्तचा आढावाचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बांधकामाधीन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.बुधवारी हे दोन्ही मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मंत्रिद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, बंटी भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व कार्यकारी अभियंता राजेश सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी अधीक्षक अभियंता एम.जे. शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी ना. महाजन यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा ३० ते ४० टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे ते म्हणाले.जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जलसंधारणाची कामे करताना शोषखड्डे, नदी पुनर्जीवन आदी कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रस्त्यांचा मोठा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. बैठकीत पाणी गुणवत्तेबाबत निरीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. बैठकीस जलसंपदा, जलसंधारण या विभागांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)