शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण

By admin | Updated: May 26, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे.

मुंडे, महाजन मंत्रिद्वयांचे प्रतिपादन : सिंचन प्रकल्प व जलयुक्तचा आढावाचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलविण्यासाठी सिंचनाच्या उत्तम सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बांधकामाधीन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.बुधवारी हे दोन्ही मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मंत्रिद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, बंटी भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व कार्यकारी अभियंता राजेश सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी अधीक्षक अभियंता एम.जे. शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी ना. महाजन यांनी सांगितले. पाण्याचे नियोजन करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा ३० ते ४० टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे ते म्हणाले.जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जलसंधारणाची कामे करताना शोषखड्डे, नदी पुनर्जीवन आदी कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रस्त्यांचा मोठा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. बैठकीत पाणी गुणवत्तेबाबत निरीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. बैठकीस जलसंपदा, जलसंधारण या विभागांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)