शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अजबच! एकीकडे म्हणतात, जैविक खत वापरा, तर दुसरीकडे रासायनिक खत खरेदीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 07:00 IST

Chandrapur News एकीकडे जैविक खतांसाठी जनजागृती तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या खरेदीचे पत्र अशा दुहेरी संभ्रमात बळीराजा अडकला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अजब फतवाशेतकरी संभ्रमात

प्रवीण खिरटकर

चंद्रपूर : रासायनिक खते व कीटकनाशके पिकांना मोठ्या प्रमाणात दिली जात असल्याने धान्य खाणाऱ्या लोकांवर त्याचे दुष्परिणाम होतात. जमिनीचा पोतही खराब होतो. त्यामुळे पिकांकरिता जैविक खताचा वापर करावा, याकरिता कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून कंबर कसली आहे. याबाबत जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे रासायनिक खते विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी संभ्रमात सापडले असल्याचे दिसून येत आहे.

मागील कित्येक वर्षापासून पिके चांगली वाढावीत व उत्पन्न अधिकाधिक व्हावे याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर करीत होते. रासायनिक खताने जमिनीची पोत खराब होतो. धान्य, भाजीपाला खाणाऱ्या व्यक्तीना विविध आजार जडत असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा याकरिता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करणे सुरू केले. या शेतकऱ्यांची संख्या सध्या कमी असली तरी शेतकरी जैविक खताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पुढील हंगामाकरिता सध्या रासायनिक खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ती विकत घ्यावीत, अशी सक्ती कृषी विभागाकडून केली जात आहे. जैविक खताचा वापर करण्याकरिता आग्रही असताना तोच विभाग रासायनिक खते विकत घेण्याचा आग्रह करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बँकेचे कर्ज फेडणार की खते घेणार

मागील हंगामात घेतलेले पीक कर्ज मार्च महिन्याच्या अखेरीस भरणा केल्यास पुढील हंगामाकरिता बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. त्यामुळे कर्ज फेडावे की खते विकत घ्यावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

टॅग्स :agricultureशेती