शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लाचखोर ठाणेदाराच्या सुरस कथा नागरिकांच्या चर्चेचा विषय

By admin | Updated: August 3, 2015 00:40 IST

चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची ...

कर्त्यव्यदक्ष ठाणेदार द्या : नागरिकांनी केली मागणीभद्रावती: चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करणाऱ्या ठाणेदारासह वाहतूक शिपायास १ आॅगस्टला लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर ठाणेदाराच्या अनेक लिला सामोर येवू लागल्या आहेत. दरम्यान, न्यायालयाने पोलीस निरीक्षक अशोक साखरकर व अन्य एका आरोपीला जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादीचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर आणि हायवा या वाहनांद्वारे तो गौण खनिजांची वाहतूक करीत असतो. त्यातच एकदा त्याचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. सदर ट्रॅक्टर वडिलांच्या नावाने असल्याने तुझ्या वडिलांंना आरोपी करावे लागेल, असे सांगून त्याला धमकाविले. शेवटी तडजोडीनंतर १० हजार रुपये देवून प्रकरण तिथेच संपविले. दुसऱ्यांदा गिट्टीने भरलेला हायवा पकडला. त्यात ३५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून प्रकरण २५ हजारावर निपटविण्याचे ठरले. त्यातील २० हजार रुपये देतांना लाचलूचपत पथकाने ठाणेदार अशोक साखरकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर चौधरी या दोघांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर ठाणेदाराची अनेक प्रकरणे सामोर आलेत. यावर्षी जिल्ह्यात अनेक रेतीघाटांना शासनाने रेतीचे उत्खनन आणि वाहतुकीसाठी परवानगी दिली नाही. या तालुक्यात जवळपास १५ ते १६ रेतीघाट आहेत. त्यांपैकी फक्त एकच रेती घाटावर रेती उपसा व वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहनधारकांनी रेती चोरीचा मार्ग अवलंबिला. सुरुवातील अशा प्रकारे चोरी करणाऱ्या वाहतूकदारांविरुद्ध पोलीस आणि महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला. नंतर हे दोन्ही विभाग शांत झाले. यात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकदारांसोबत आर्थिक तडजोड केल्याची चर्चा आहे. यात प्रती ट्रॅक्टर आठ हजार, हापटन १५ हजार, तर हायवा २५ हजार असा प्रतीमाह दर ठरविल्या गेला. ज्या वाहन मालकांनी ही तडजोड केली नाही, अशांची वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विश्वासातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सपाटा लावला. यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण अवैध गौण खनिजाच्या चोरीवर कारवाई करीत असल्याचा भास निर्माण केला. या माध्यमातून दोन्ही विभागाचे हे अधिकारी लाखो रुपयांची माया जमावित होते. त्यातच १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी लागू करण्यात आली. याचा फायदा सुद्धा ठाणेदारांनी घेतला. काही अवैध दारू व्यवसायिकांशी हात मिळवणी करुन त्यातूनही महिन्याला लाखोची माया जमविली.एकीकडे महसूल विभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुंतला आहे तर दुसरीकडे लाच घेताना ठाणेदार सापडले. याचा फायदा काही वाहतूकदारांना घेतला असून आता त्यांनी गौण खनिजांची राजरोसपणे चोरी करणे सुरू केले आहे. तसेच अवैध दारू व्यवसायिकसुद्धा आता आपल्याला हप्ता द्यावा लागणार नाही, या विचाराने आनंदीत झाले आहेत. या व्यवसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)