शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

लाचखोर ठाणेदाराच्या सुरस कथा नागरिकांच्या चर्चेचा विषय

By admin | Updated: August 3, 2015 00:40 IST

चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची ...

कर्त्यव्यदक्ष ठाणेदार द्या : नागरिकांनी केली मागणीभद्रावती: चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करणाऱ्या ठाणेदारासह वाहतूक शिपायास १ आॅगस्टला लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर ठाणेदाराच्या अनेक लिला सामोर येवू लागल्या आहेत. दरम्यान, न्यायालयाने पोलीस निरीक्षक अशोक साखरकर व अन्य एका आरोपीला जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादीचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर आणि हायवा या वाहनांद्वारे तो गौण खनिजांची वाहतूक करीत असतो. त्यातच एकदा त्याचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. सदर ट्रॅक्टर वडिलांच्या नावाने असल्याने तुझ्या वडिलांंना आरोपी करावे लागेल, असे सांगून त्याला धमकाविले. शेवटी तडजोडीनंतर १० हजार रुपये देवून प्रकरण तिथेच संपविले. दुसऱ्यांदा गिट्टीने भरलेला हायवा पकडला. त्यात ३५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून प्रकरण २५ हजारावर निपटविण्याचे ठरले. त्यातील २० हजार रुपये देतांना लाचलूचपत पथकाने ठाणेदार अशोक साखरकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर चौधरी या दोघांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर ठाणेदाराची अनेक प्रकरणे सामोर आलेत. यावर्षी जिल्ह्यात अनेक रेतीघाटांना शासनाने रेतीचे उत्खनन आणि वाहतुकीसाठी परवानगी दिली नाही. या तालुक्यात जवळपास १५ ते १६ रेतीघाट आहेत. त्यांपैकी फक्त एकच रेती घाटावर रेती उपसा व वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहनधारकांनी रेती चोरीचा मार्ग अवलंबिला. सुरुवातील अशा प्रकारे चोरी करणाऱ्या वाहतूकदारांविरुद्ध पोलीस आणि महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला. नंतर हे दोन्ही विभाग शांत झाले. यात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकदारांसोबत आर्थिक तडजोड केल्याची चर्चा आहे. यात प्रती ट्रॅक्टर आठ हजार, हापटन १५ हजार, तर हायवा २५ हजार असा प्रतीमाह दर ठरविल्या गेला. ज्या वाहन मालकांनी ही तडजोड केली नाही, अशांची वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विश्वासातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सपाटा लावला. यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण अवैध गौण खनिजाच्या चोरीवर कारवाई करीत असल्याचा भास निर्माण केला. या माध्यमातून दोन्ही विभागाचे हे अधिकारी लाखो रुपयांची माया जमावित होते. त्यातच १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी लागू करण्यात आली. याचा फायदा सुद्धा ठाणेदारांनी घेतला. काही अवैध दारू व्यवसायिकांशी हात मिळवणी करुन त्यातूनही महिन्याला लाखोची माया जमविली.एकीकडे महसूल विभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुंतला आहे तर दुसरीकडे लाच घेताना ठाणेदार सापडले. याचा फायदा काही वाहतूकदारांना घेतला असून आता त्यांनी गौण खनिजांची राजरोसपणे चोरी करणे सुरू केले आहे. तसेच अवैध दारू व्यवसायिकसुद्धा आता आपल्याला हप्ता द्यावा लागणार नाही, या विचाराने आनंदीत झाले आहेत. या व्यवसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)