शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

लाडज येथे वादळाचा कहर ३३ घरांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:14 IST

वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे.लाडज हे गाव ब्रह्मपुरीच्या ईशान्येस १० किमी अंतरावर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जणू बेट असल्याचे दिसून येते. गावाला चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढले आहे. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. गुरुवारी सायंकाळी अचानक वादळाने तडाखा दिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कैलास श्रवण मोहुर्ले, कैलास देवराव अलोने, चक्रधर श्रवण मोहुर्ले, भास्कर हरबा राऊत यांच्या घराचे छप्पर उडाल्याने ते सद्या जि.प. शाळेच्या खोल्यांमध्ये कुटुंबासह आश्रय घेतला आहे. या वादळात २९ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मोठी झाडे उन्मळून पडली.वादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जि.प. गटनेते सतीश वारजूकर, जि.प. सदस्य स्मिता पारधी, तहसीलदार विद्यासागर चौहान, मंडळ अधिकारी शरद तुपट, तलाठी किशोर सापटे, वितेश्वर येरमा, हेमराज डांगे आदींनी गावाला भेट देवून आपदग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.संकटाची टांगती तलवारलाडज गावावर पावसाळ्यात संकटाची टांगती तलवार असते. दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने तालुक्याशी संपर्क तुटतो. मागील वर्षी पूर आल्याने डोंग्याचा वापर करावा लागला. दरम्यान, डोंगा उलटल्याने दोघे वाहून गेल्याची घटना घडली होती. गावाच्या संपर्कासाठी पूलाची गरज आहे. पण, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.वादळाचा तडाखा बसलेल्या चार विस्थापित कुटुंबाना सानुग्राह्य अनुदान तातडीने देण्यात येईल. नियमाप्रमाणे मुल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही.-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार ब्रह्मपुरी