शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची सामाजिक पिळवणूक थांबता थांबेना

By admin | Updated: March 8, 2017 00:47 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, ....

विविध क्षेत्रात महिलांची भरारी, तरीही अवहेलनामहिला दिन विशेषप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, तिला तिच्या हक्काची जाणीव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी महिलांची समाजात आजही पिळवणूक होत आहे. यावर आज सामाजिक विचारमंथन करणे काळाची गरज ठरली आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा, समाजात सातत्याने होणारी महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्त्रि शक्तीचा जागर केला जातो. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली, तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजातच अशा असंख्य कर्तबगार महिला आहेत. त्यांना आपल्या हक्कासाठी लढतांना आयुष्यच मातीमोल करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा हक्क, अधिकार मिळतो, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे. याचाही जागतिक महिला दिनी विचार झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतू त्यांच्या पाठीमागे लागलेला सामाजिक जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही.महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यांवर झळकत असले, तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे अधिकार हक्क का मिळत नाही? हे महिलांचे धगधगाते वास्तव आजही कायम आहे. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे आहेत. तरी दिवसेंदिवस महिलांवरी होणाऱ्या अत्याचारास वाढ झाली आहे. केवळ कायदा करून महिलांवरील होणारे अत्याचार रोखता येणार नाही. तर सामाजिक परिवर्तन करून महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तरच जागतिक महिला दिन आपल्याला अभिमानाने साजरा करता येईल.आज देशभरात जागतिक महिला दिन साजरा होईलही परंतू, स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच मातीमोल झाले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवनसंघर्ष थांबणार कधी हा खरा प्रश्न सर्वासमोर आहे.न्यायासाठी संघर्षसामाजिक विकासात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. महिलांनी प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची ताकद दाखवून दिली आहे. तरीही महिलांची समाजात दिवसेंदिवस वाढत असलेली अवहेलना सामाजिक चिंतेचा विषय झाला आहे. न्यायासाठी महिलांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. न्यायाच्या प्रतिक्षेत महिलांचे आयुष्य आजही मातीमोल झाले आहे.