शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

महिलांची सामाजिक पिळवणूक थांबता थांबेना

By admin | Updated: March 8, 2017 00:47 IST

महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, ....

विविध क्षेत्रात महिलांची भरारी, तरीही अवहेलनामहिला दिन विशेषप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केल. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहू नये, तिला तिच्या हक्काची जाणीव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी महिलांची समाजात आजही पिळवणूक होत आहे. यावर आज सामाजिक विचारमंथन करणे काळाची गरज ठरली आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा, समाजात सातत्याने होणारी महिलांची पिळवणूक कायमची थांबावी, यासाठी देशभरात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्त्रि शक्तीचा जागर केला जातो. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली, तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजातच अशा असंख्य कर्तबगार महिला आहेत. त्यांना आपल्या हक्कासाठी लढतांना आयुष्यच मातीमोल करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्याचा हक्क, अधिकार मिळतो, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुत्तरीतच आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे. याचाही जागतिक महिला दिनी विचार झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी काबीज केले आहे. परंतू त्यांच्या पाठीमागे लागलेला सामाजिक जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही.महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यांवर झळकत असले, तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे अधिकार हक्क का मिळत नाही? हे महिलांचे धगधगाते वास्तव आजही कायम आहे. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे आहेत. तरी दिवसेंदिवस महिलांवरी होणाऱ्या अत्याचारास वाढ झाली आहे. केवळ कायदा करून महिलांवरील होणारे अत्याचार रोखता येणार नाही. तर सामाजिक परिवर्तन करून महिलांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज आहे. तरच जागतिक महिला दिन आपल्याला अभिमानाने साजरा करता येईल.आज देशभरात जागतिक महिला दिन साजरा होईलही परंतू, स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच मातीमोल झाले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवनसंघर्ष थांबणार कधी हा खरा प्रश्न सर्वासमोर आहे.न्यायासाठी संघर्षसामाजिक विकासात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. महिलांनी प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची ताकद दाखवून दिली आहे. तरीही महिलांची समाजात दिवसेंदिवस वाढत असलेली अवहेलना सामाजिक चिंतेचा विषय झाला आहे. न्यायासाठी महिलांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. न्यायाच्या प्रतिक्षेत महिलांचे आयुष्य आजही मातीमोल झाले आहे.