शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:56 IST

गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जा सुमार : ओपन स्पेसवर ठेकेदाराचा ताबा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, या उदात्त हेतूने येथील प्रभाग क्रमांक १, शिक्षक कॉलनीत पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेले हे काम सात वर्षानंतरही अपुर्ण आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या नेतृत्वात नागरिकांनी सोमवारी हे काम बंद पाडून आपला रोष व्यक्त केला.टिचर कॉलनीतील साई शांतीनगरातील दोन ओपनस्पेसमध्ये सदर काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून पिल्लरवरील प्लास्टर नगराध्यक्षासह नागरिकांनी हाताने काढून दाखवले. यावरून संपूर्ण कामाचा दर्जा लक्षात येतो. वॉर्डात ओपनस्पेस बेवारस अवस्थेत पडलेले पाईप, लोहा, रेती, गिट्टी, सेंट्रिंग इत्यादी ठेवल्या आहेत. त्याचा त्रास होत आहे.सात वर्षानंतरही काम अपूर्णजीवन प्राधिकरणमार्फत सुरू असलेल्या सदर कामाला २२ नोव्हेंबर २०१० साली प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. १० कोटी ३५ लाख, ४२ हजार वित्तीय आकृती बंधनानुसार १२ जानेवारी २०१२ साली नागपूर येथील कंत्राटदाराने काम सुरू केले. काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन वर्ष इतका होता. मात्र सात वर्षे लोटूनही काम पूर्ण न झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात गडचांदूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.गडचांदूरच्या नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पाणी टाकीतून काही भागात पुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र ५ मेपर्यंत सुरु होऊन शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. दोन्ही ओपनस्पेसला सरंक्षण भिंत करून दिली जाईल.- के.एम. शेख, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,