शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:04 IST

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी अपघाताच्या घटना टळणार : हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या वतीने मागील १ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता.बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा व बल्लारपूर हा मार्ग वनविकास महामंडळ व मध्य चांदा वनविभागाच्या जंगलातून जातो. मागील ४ वर्षात या मार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात वाघ, बिबट, अस्वल यांच्या अपघाती मृत्यूची नोंद वनविभागाकडे आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही वनविकास महामंडळाकडून यावर कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे अनेक वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. या रस्त्यावर अनेकदा लोकांना वाघाचे दर्शन झाले. तर कारवा-बल्लारपूर मार्गावर सुद्धा एका रानगव्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. जुनोना-पोंभुर्णा, चिचपल्ली-जुनोना-कारवा-बल्लारपूर हे संपूर्ण जंगलाने वेढलेले रस्ते आहेत. या जंगलात मांसभक्षी व तृणभक्षींची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्रजातीचे साप, बेडूक, पाली, सरडे, पक्षी यांचा अधिवास आहे.मात्र रात्रीच्या वेळेस चिचपल्ली-जुनोना-कारवा मार्गे बल्लारपूर व पोंभुर्णा-जुनोना मार्गे चंद्रपूर या रस्त्यावर अवैध वाहतूक वाढल्याने अनेक अपघात घडत होते. जुनोनापासून अवघ्या २ किमी अंतरावर काही दिवसांपुर्वी अस्वलीला जीव गेला होता. अपघातात वन्यजीवांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना या सार्वजनिक बांधकाम विभागाला संस्थेच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आल्या होत्या. यावर गंभीरपणे लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण न करण्याची मागणी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली होती.गतिरोधक उभारून अवैध वाहतूक रोखण्याची मागणीहॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने केलेल्या मागणीची दखल घेत बांधकाम विभागाने रूंदीकरणाचे काम थांबविले आहे. गरजेच्या ठिकाणी गतीरोधक उभारण्यात येणार आहे. वनविकास महामंडळाला चिचपल्ली-जुनोना मार्गावर सायंकाळी ६ वाजतानंतर वाहतूक बंद करण्याची मागणी केली असून अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.