शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा रस्त्याचे रुंदीकरण थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:04 IST

बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी अपघाताच्या घटना टळणार : हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते. मात्र वाहनाच्या धडकेत वाढत्या वन्यजीवांच्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. हॅबिटेट कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या वतीने मागील १ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू होता.बाबुपेठ-जुनोना-पोंभुर्णा व बल्लारपूर हा मार्ग वनविकास महामंडळ व मध्य चांदा वनविभागाच्या जंगलातून जातो. मागील ४ वर्षात या मार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात वाघ, बिबट, अस्वल यांच्या अपघाती मृत्यूची नोंद वनविभागाकडे आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही वनविकास महामंडळाकडून यावर कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे अनेक वन्यजीवांना प्राण गमवावा लागला. या रस्त्यावर अनेकदा लोकांना वाघाचे दर्शन झाले. तर कारवा-बल्लारपूर मार्गावर सुद्धा एका रानगव्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. जुनोना-पोंभुर्णा, चिचपल्ली-जुनोना-कारवा-बल्लारपूर हे संपूर्ण जंगलाने वेढलेले रस्ते आहेत. या जंगलात मांसभक्षी व तृणभक्षींची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्रजातीचे साप, बेडूक, पाली, सरडे, पक्षी यांचा अधिवास आहे.मात्र रात्रीच्या वेळेस चिचपल्ली-जुनोना-कारवा मार्गे बल्लारपूर व पोंभुर्णा-जुनोना मार्गे चंद्रपूर या रस्त्यावर अवैध वाहतूक वाढल्याने अनेक अपघात घडत होते. जुनोनापासून अवघ्या २ किमी अंतरावर काही दिवसांपुर्वी अस्वलीला जीव गेला होता. अपघातात वन्यजीवांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना या सार्वजनिक बांधकाम विभागाला संस्थेच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आल्या होत्या. यावर गंभीरपणे लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण न करण्याची मागणी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली होती.गतिरोधक उभारून अवैध वाहतूक रोखण्याची मागणीहॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने केलेल्या मागणीची दखल घेत बांधकाम विभागाने रूंदीकरणाचे काम थांबविले आहे. गरजेच्या ठिकाणी गतीरोधक उभारण्यात येणार आहे. वनविकास महामंडळाला चिचपल्ली-जुनोना मार्गावर सायंकाळी ६ वाजतानंतर वाहतूक बंद करण्याची मागणी केली असून अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.