शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

सीटीपीएसची वीज निर्मिती बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:42 IST

चंद्रपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात अतिशय कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यातून चंद्रपूरकरांनाच पाणी मिळणे कठीण होत आहे. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच बंद करण्यात आलेले नाही. येत्या १५ ते २० दिवसात पाणीसाठा संपण्याच्या स्थितीत पोहोचणार आहे.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार यांचा इशारा : अन्यथा तीव्र आंदोलन उभारू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात अतिशय कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यातून चंद्रपूरकरांनाच पाणी मिळणे कठीण होत आहे. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच बंद करण्यात आलेले नाही. येत्या १५ ते २० दिवसात पाणीसाठा संपण्याच्या स्थितीत पोहोचणार आहे. त्यामुळे सीटीपीएसची वीज निर्मिती तुर्तास बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. असे न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.किशोर जोरगेवार यांनी इरई धरणातील जलसाठ्याची रविवारी पाहणी केली. साठा चिंताजनक दिसून आल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त मागणी केली.मनपाकडून आमसभा घेण्यात आली होती. पण त्यामध्ये पाण्यासारखा गंभीर प्रश्न चर्चेलासुद्धा घेण्यात आला नाही. या विषयाकडे लोकप्रतिनिधी व शासन-प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. चंद्रपूरची भूजल पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणच्या विहिरी, बोअरिंगच्या पाण्याची पातळी तळाशी गेल्याने पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. इरई धरणात २०२.०५० मीटर इतके पाणी शिल्लक आहे.धरणाची क्षमता ३६ एम.एम. क्युबिक मीटर इतकी आहे. चंद्रपूर शहराला दर महिन्यात फक्त एक एम.एम. क्युबिक मीटर पाणी वापरासाठी लागते. असे असतानाही मनपा प्रशासन शहरातील जनतेला पाणी देऊ शकत नाही आहे. जोपर्यंत महाऔष्णिक विद्युत केंद्र बंद करणार नाही, तोपर्यंत जनतेला पाणी मिळणार नाही.पाण्याच्या विषयावर बोलण्यास वीज केंद्रातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही जोरगेवार यांनी केला. मे महिन्यापर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष धरणाची पाहणी केली असता तसे वाटत नाही. त्यामुळे वीज केंद्रातील संच तत्काळ बंद करावे, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले....तर जून महिन्यापर्यंत पुरणार पाणीसध्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातील चार संच चालू आहेत. इतर संच बंद करण्यात आले आहे. आता जे संच चालू आहे, ते पुन्हा चालू असले तर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाºयांच्या माहितीनुसार एक महिन्यापर्यंत शहरातील जनतेला पाणी पुरवठा होऊ शकतो. पूर्ण संच बंद ठेवले तर जून महिन्यापर्यंत शहरातील जनतेला सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो. जनतेला पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागणार आहे, असेही किशोर जोरगेवार यांनी सांगितले.