शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कृषी केंद्रांकडून बळीराजाची होणारी लयलूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST

गोंडपिपरी : शेतीच्या हंगामाने कृषी केंद्रांना सुगीचे दिवस आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्रचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. विस्ताराने ...

गोंडपिपरी : शेतीच्या हंगामाने कृषी केंद्रांना सुगीचे दिवस आहेत. गोंडपिपरी शहरासह खेडोपाडी या केंद्रचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या गोंडपिपरी तालुक्यासाठी ही बाब आशादायी आहे; मात्र कृषी केंद्रचालकांकडून ग्रामीणांच्या अज्ञानाचा फायदा घेत लुटीचा गोरखधंदा चालविल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांची ही फसगत आता थांबवावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वात गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. संसाराचा गाडा हाकताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. आता नव्या हंगामाची लगबग जोमात आहे. यात गोंडपिपरी शहरासह तालुक्यातील कृषी केंद्रचालकांनी बळीराजाची होणारी लूट आता चर्चेचा विषय ठरला आहे. या कृषी केंद्रचालकांनी बी-बियाणे,खतांच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेण्याचा सपाटा चालविला आहे. केंद्रात साहित्य असताना देखील त्याची साठवणूक करून अधिक पैशाने विकण्याचा प्रकार गोंडपिपरीत नवा नाही. कृषी विभागाने बळीराजाची लूट थांबविण्याची मागणी महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुनघाडकर, राष्ट्रवादीचे नेते अरुण वासलवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शैलेशसिंह बैस, आनंदराव गोहणे,अशफाक कुरेशी,विवेक राणा आदींची उपस्थिती होती.

110921\img-20210911-wa0013.jpg

कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना महाविकासआघाडी पदाधिकारी