शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे.

ठळक मुद्देतीन गावातील शेतकऱ्यांना अडचण : बांधकामही निकृष्ट दर्जाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पारधीगुडा-मंगी रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार थातूरमातूर बांधकाम करीत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय या रस्त्यामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार व गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे. या मार्गावरील नाल्यात थातूरमातूर सिमेंट पाईप टाकून काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूला मोठी नाली काढल्याने या परिसरात शेती करणाºया पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील शेतकºयांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता बांधकाम करताना रस्ता खचून जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. कंत्रादारांकडून नाली बांधकाम करून त्यावर छोटा सिमेंट काँक्रीट रपटा बांधणे गरजेचे होते. परंतू चांगल्या कामांना बगल देत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी विविध अवजारे घेऊन शेतात जात असतात. मात्र या रस्त्या बंद झाल्याने शेतकºयांना मोठी अडचण जात आहे. खरीप हंगामपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला परिसरातील शेतकऱ्याच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्याची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या बांधकामाची सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी चौकशी करावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव ग्रामपंचायत.

टॅग्स :agricultureशेती