शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पारधीगुडा मंगी रस्त्याने शेतात जाणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे.

ठळक मुद्देतीन गावातील शेतकऱ्यांना अडचण : बांधकामही निकृष्ट दर्जाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पारधीगुडा-मंगी रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कंत्राटदार थातूरमातूर बांधकाम करीत असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय या रस्त्यामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार व गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता तयार करताना कंत्राटदाराने खर्च वाचविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून माती न आणता रस्त्याच्या बाजूला मोठी नाली काढून त्या नालीतील माती रस्त्यावर टाकली आहे. या मार्गावरील नाल्यात थातूरमातूर सिमेंट पाईप टाकून काम करण्यात आले आहे. पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूला मोठी नाली काढल्याने या परिसरात शेती करणाºया पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील शेतकºयांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता बांधकाम करताना रस्ता खचून जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. कंत्रादारांकडून नाली बांधकाम करून त्यावर छोटा सिमेंट काँक्रीट रपटा बांधणे गरजेचे होते. परंतू चांगल्या कामांना बगल देत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी विविध अवजारे घेऊन शेतात जात असतात. मात्र या रस्त्या बंद झाल्याने शेतकºयांना मोठी अडचण जात आहे. खरीप हंगामपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला परिसरातील शेतकऱ्याच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पाचगाव, पारधीगुडा, मंगी येथील ५० ते ६० शेतकऱ्याची शेतात जाण्याची वाटच बंद झाली आहे. रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या बांधकामाची सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी चौकशी करावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव ग्रामपंचायत.

टॅग्स :agricultureशेती