शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लाठी पोलिसांच्या ताब्यातील जनावरे कुणाची?

By admin | Updated: October 22, 2015 00:56 IST

राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे.

प्रकरण तपासात : खरेदी-विक्रीच्या पावत्याच पोलिसांकडे नाहीतआक्सापूर : राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. तरीही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर जनावरांची आंतरराज्यीय तस्करी सुरु आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाच लाठी पोलिसांनी २७ जनावरे घेऊन तेलंगणात जाणारे वाहन पोडसा पुलाजवळ पकडले. या कारवाईला १५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी ही जनावरे चोरीची आहेत, की खरेदीची आहेत, याचा तपास लावण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. यातच अजूनपर्यंत सदर जनावरांच्या खरेदीविक्रीची कागदपत्रे पोलिसांच्या हाती न लागल्याने लाठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.४ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लाठी पोलिसांच्या पथकाने २७ जनावरे घेऊन तेलंगणाकडे जात असलेले वाहन पकडले. या वाहनात गाय, बैल होते. वाहनासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांतील संपूर्ण जनावरांना लाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २७ जनावरांपैकी तीन जनावरांचे आरोग्य ढासळले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २४ जनावरांना लाठीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे खरेदी-विक्रीच्या पावत्या आढळल्या नसल्याची माहिती लाठीचे ठाणेदार चौथनकर यांनी दिली. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे, सदर घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जनावरांच्या खऱ्या मालकांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता तपास सुरु आहे, यापुढे माहिती देण्यास लाठी पोलीस तयार नाही.आरोपींवर प्राणीसंरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरुन मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होते. याबाबतचे अनेक प्रकार समोर आले आहेत.पोडसा येथील जनावरांना पकडल्याच्या प्रकारानंतर लाठी पोलिसांना तस्करांची साखळी शोधण्याची मोठी संधी मिळाली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मानसिकता लाठी पोलिसांनी दाखविली नाही, असा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. अशातच गोंडपिपरी तालुक्यातील गावागावातून जनावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जात आहे. (वार्ताहर)