शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

लाठी पोलिसांच्या ताब्यातील जनावरे कुणाची?

By admin | Updated: October 22, 2015 00:56 IST

राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे.

प्रकरण तपासात : खरेदी-विक्रीच्या पावत्याच पोलिसांकडे नाहीतआक्सापूर : राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. तरीही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर जनावरांची आंतरराज्यीय तस्करी सुरु आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाच लाठी पोलिसांनी २७ जनावरे घेऊन तेलंगणात जाणारे वाहन पोडसा पुलाजवळ पकडले. या कारवाईला १५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी ही जनावरे चोरीची आहेत, की खरेदीची आहेत, याचा तपास लावण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. यातच अजूनपर्यंत सदर जनावरांच्या खरेदीविक्रीची कागदपत्रे पोलिसांच्या हाती न लागल्याने लाठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.४ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लाठी पोलिसांच्या पथकाने २७ जनावरे घेऊन तेलंगणाकडे जात असलेले वाहन पकडले. या वाहनात गाय, बैल होते. वाहनासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांतील संपूर्ण जनावरांना लाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २७ जनावरांपैकी तीन जनावरांचे आरोग्य ढासळले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २४ जनावरांना लाठीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे खरेदी-विक्रीच्या पावत्या आढळल्या नसल्याची माहिती लाठीचे ठाणेदार चौथनकर यांनी दिली. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे, सदर घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जनावरांच्या खऱ्या मालकांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता तपास सुरु आहे, यापुढे माहिती देण्यास लाठी पोलीस तयार नाही.आरोपींवर प्राणीसंरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरुन मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होते. याबाबतचे अनेक प्रकार समोर आले आहेत.पोडसा येथील जनावरांना पकडल्याच्या प्रकारानंतर लाठी पोलिसांना तस्करांची साखळी शोधण्याची मोठी संधी मिळाली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मानसिकता लाठी पोलिसांनी दाखविली नाही, असा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. अशातच गोंडपिपरी तालुक्यातील गावागावातून जनावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जात आहे. (वार्ताहर)