शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लाठी पोलिसांच्या ताब्यातील जनावरे कुणाची?

By admin | Updated: October 22, 2015 00:56 IST

राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे.

प्रकरण तपासात : खरेदी-विक्रीच्या पावत्याच पोलिसांकडे नाहीतआक्सापूर : राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. तरीही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर जनावरांची आंतरराज्यीय तस्करी सुरु आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाच लाठी पोलिसांनी २७ जनावरे घेऊन तेलंगणात जाणारे वाहन पोडसा पुलाजवळ पकडले. या कारवाईला १५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी ही जनावरे चोरीची आहेत, की खरेदीची आहेत, याचा तपास लावण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. यातच अजूनपर्यंत सदर जनावरांच्या खरेदीविक्रीची कागदपत्रे पोलिसांच्या हाती न लागल्याने लाठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.४ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लाठी पोलिसांच्या पथकाने २७ जनावरे घेऊन तेलंगणाकडे जात असलेले वाहन पकडले. या वाहनात गाय, बैल होते. वाहनासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांतील संपूर्ण जनावरांना लाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २७ जनावरांपैकी तीन जनावरांचे आरोग्य ढासळले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २४ जनावरांना लाठीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे खरेदी-विक्रीच्या पावत्या आढळल्या नसल्याची माहिती लाठीचे ठाणेदार चौथनकर यांनी दिली. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे, सदर घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जनावरांच्या खऱ्या मालकांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता तपास सुरु आहे, यापुढे माहिती देण्यास लाठी पोलीस तयार नाही.आरोपींवर प्राणीसंरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरुन मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होते. याबाबतचे अनेक प्रकार समोर आले आहेत.पोडसा येथील जनावरांना पकडल्याच्या प्रकारानंतर लाठी पोलिसांना तस्करांची साखळी शोधण्याची मोठी संधी मिळाली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मानसिकता लाठी पोलिसांनी दाखविली नाही, असा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. अशातच गोंडपिपरी तालुक्यातील गावागावातून जनावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जात आहे. (वार्ताहर)