शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

चंगळवादी, उथळ विचारांपासून दूर राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:26 IST

‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे.

ठळक मुद्देव्हेलेंटाईन डे : मैत्रीचे निकोप मूल्य आचरणात आणण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : ‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे. यामुळे अशा विचारांपासून दूर राहण्यासाठी समाजप्रेमी व सामाजिक भान असणाऱ्या तरूणाईने अन्य युवक-युवतींना सावध करण्याचा संकल्प केला पाहिजे.मैत्रीच्या नात्यात व्यवहार, उपकार व आभार नसतो. केवळ एका मनाचे दुसºया मनाशी निखळ आपुलकीने नाती समृद्ध करायचे असते. या दिवसाची अनेकजन आतूरतेने वाट पाहत असतात. आवडीच्या व्यक्तीच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी हे प्रेमवेडे निवांत ठिकाणी फिरायला जातात. बगिचा, वनराई, माळरान, निवांत किल्ले, मंदिर, नदी, नाले, तलाव, धरणे, डोंगर, धबधबे अशा ठिकाणांना पसंती असते. मैत्री, प्रेम या भावनांना मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मैत्री व प्रेम या दोनही बाबी पूर्णपणे भिन्न असल्या तरी त्यात जवळीकता आहे. मैत्री, प्रेमाला रंग नसतो. जात, धर्म, पंथ या बंधनात अडकून ठेवता येत नाही. निरागसपणे मनाला आल्हाद देणारे हे नाते अलगदपणे निर्माण होते. मैत्री, प्रेम यातून निर्माण झालेल्या नात्यात एकनिष्ठ राहून पुढे वाटचाल केली पाहिजे. मैत्री व प्रेमाला व्यक्त करण्यासाठी तरूण पिढी आता वाईट गोष्टींच्या नादी लागली. या दिवशी प्रेक्षणीय स्थळांच्या परिसरात नजर टाकल्यास मान खाली जाते. सोशल मिडियामुळे संवादाची प्रक्रिया गतिमान झाली. तरूणाईवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. यातूनच चुकीच्या मार्गाने जाणाºया युवक-युवतींची संख्या वाढू लागली आहे. या समस्येवर पालक आणि पाल्यांचा सुसंवाद हाच एकमेव पर्याय आहे. किमान जागरूक युवक-युवतींनी याचे भान ठेवून हा दिवस साजरा केला पाहिजे.