शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

चंद्रपूर : शहीद भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी ...

चंद्रपूर : शहीद भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी आदिवासी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक चर्चा करून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी क्रांतिवीर नारायणसिंह उईके, आदिवासी विकास संस्थेचे अशोक तुमराम, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, प्रदीप गेडाम, प्रीती पेंदोर, जितेंद्र बोरकुटे, जमुना तुमराम उपस्थित होते. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. चंद्रपुरातील आदिवासी संघटना व समाज बांधवांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून रेल्वे स्थानकाजवळ शहीद बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला होता; परंतु चंद्रपूर मनपा प्रशासनाने अत्यंत निर्दयीपणे क्रेनच्या सहाय्याने महापुरुषांचा पुतळा हटविला. त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष आहे. प्रशासनाचा निषेध म्हणून सत्याग्रहही सुरू आहे. दरम्यान, आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी चर्चा करून हा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

मनपाने पुढाकार घेतल्यास निधी देणार

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तेजस्वी योगदान दिलेल्या भगवान शहीद बिरसा मुंडा हे लोकांच्या मनात आहेत. महापुरुषांची विटंबना करणे योग्य नाही. चंद्रपूर मनपाने या महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी निधीची आवश्यकता असल्यास देऊ, अशी ग्वाही आमदार जोरगेवार यांनी चर्चेदरम्यान दिली.