शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

गडचांदूर तालुका निर्मितीसाठी खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

गडचांदूर : कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात ...

गडचांदूर : कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले.

गडचांदूर तालुका निर्मितीची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे, यासाठी संघर्ष समितीच्यावतीने अनेकदा आंदोलने झाली, शासनानेसुद्धा याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. गडचांदूर तालुका निर्मितीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघाने समर्थन दिले आहेत. गडचांदूर हे शहर तालुकाच्या दृष्टीने शासनाचे सर्व निकष पूर्ण करत आहे, गडचांदूरपेक्षा अतिशय लहान शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. केवळ राजकीय पाठबळ नसल्याने तालुका निर्मितीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा शासनाने आता तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीचे संघटक उद्धव पुरी, अशोककुमार उमरे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेत,

सोबतच शहरात एक सुसज्ज सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे, माजी अध्यक्ष रोहित शिंगाडे, आदी उपस्थित होते.