शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केबलच्या खोदकामामुळे राज्य मार्गाची दुरवस्था

By admin | Updated: June 17, 2015 01:56 IST

मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला

बल्लारपूर : मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम सुरू आहे. यामुळे राज्य महामार्गाची दुरवस्था होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बल्लारपूर शहरातील रस्त्याच्या बाजुला खड्डे निर्माण झाले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वनविभागाच्या झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमापासून गोंडपिपरीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने चंद्रपूर येथील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून एअरटेल कंपनीच्या भूमीगत केबल लाईनसाठी खोदकाम केले जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र खोदकाम करण्यासाठी पूर्व परवानगी घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. परिणामी चौपदरी रस्त्याच्या एका बाजूला खड्डे निर्माण झाले आहेत. बल्लारपूर शहरात तर ऐन रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. परिणामी रस्त्याच्या बाजूला असणारे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.बामणी (दुधोली) ते चंद्रपूर दरम्यान मार्गाचे चौपदीरकरण करण्यात आले. या मार्गावर एकेरी वाहतूक सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. अशातच केबलच्या खोदकामामुळे चांगल्या मार्गाचे विद्रुपीकरण करण्याचे धोरण केबल व्यवस्थापनाकडून केले जात आहे. परिणामी शहरातील मार्गावर खड्डे निर्माण होऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर बहुतेक ठिकाणी जंगलव्याप्त भाग आहे. वृक्षाचे जतन करणे महत्त्वाचे असूनही केबलच्या खोदकामासाठी रस्त्यालगतच्या झाडाची सर्रास कत्तल केल्याचे दिसून येते.दूरसंचार सेवा कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी वनविभागाला व सार्वजनिक बांधकाम विभागालाच एअरटेल कंपनीच्या व्यवस्थापनाने वेठीस धरल्याचे दिसते. यामुळे केबलच्या अनाधिकृत खोदकामाकडे वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांचे खोदकामावर नियंत्रण नसल्याने संबंधित कंत्राटदार नियमाला डावलून काम करीत आहे. केबलच्या खोदकामामुळे प्राणहाणी झाल्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. सदर खोदकामाला अनाधिकृतपणे संमती देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)वाहतुकीस अडथळा४रस्त्याच्या लगत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यालगतची माती डांबरीकणावर पसरत आहे. त्यामुळे रस्त्यावर बारीक माती साचून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.