शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची दैना

By admin | Updated: October 12, 2015 01:34 IST

राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षदेवाडा : राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा भास होतो. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात दिवसागणिक वाढच होत आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहे. या भागातील बहुतांश जनता तेलगु भाषिक आहेत. त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाची जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील अनेक गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पादचारी, दुचाकी, चारचाकीधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासन जनतेच्या मुलभूत सोयी सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याचा दावा करीत आहे. त्यात रस्त्याच्या विकासाला प्राधान्य आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करूनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. कितीही पैसा ओतला तरी या रस्त्यावरचे खड्डे काही केल्या बुजत नाही. उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. राजुरा रेल्वे गेट ते सुमठाणा तुलाना वरुर रोड, सोन्डो, सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, लक्कडकोट रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्ते बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे हा पैसा कुठे जिरतो. हे कळायला मार्ग नाही. डांबराचे प्रमाण कमी असते. डांबर पातळ करण्यासाठी एलडीओ नावाचा पदार्थ मिसळावा लागतो. मात्र ते महागडे असल्याने डांबरात केरोसिन वापरले जाते. केरोसिन वापरणे हे नियमबाह्य आहे. केरोसिनमुळे डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाचे अभियंते अशा रस्त्यांना सर्रास मंजुरी देतात. त्यामुळे तीन ते चार महिण्यात रस्ते उखडतात. या प्रकारात सर्वांचे हित असल्याने रस्ता कधी उखडेल याचीच सारेजण वाट बघत असतात. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचे निरीक्षणच योग्यरित्या होत नाही. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांना दहा टनांची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटीएका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे रस्त्याचे बेहाल झाले आहेत. (वार्ताहर)