शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

राज्यस्तरीय समिती एकाच दिवसात परतली

By admin | Updated: February 2, 2017 00:32 IST

स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने आपला नियोजित चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा दोन दिवसांचा दौरा सहलीसारखा एकाच दिवशी आटोपला असून...

घाईगर्दीत केली पाहणी : दोन दिवसांचा होता नियोजित दौराचंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यस्तरीय तपासणी समितीने आपला नियोजित चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा दोन दिवसांचा दौरा सहलीसारखा एकाच दिवशी आटोपला असून या दौऱ्यादरम्यान समितीने घाईगर्दीत हागणदारीमुक्त परिसर, सार्वजनिक शौचालये तसेच शाळांची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर या अभियानातंर्गत चंद्रपूर शहर स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. मार्च २०१७ अखेर चंद्रपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. या अभियानातंर्गत महानगरपालिकेने काय प्रगती केली याची पाहणी करण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्रीय स्वच्छता समितीने दौरा केला होता. आता राज्यस्तरीय समितीने दौरा केला. या समितीत नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, नागपूर विभाग आयुक्त कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक संचालक (नगरपालिका प्रशासन) कैलास झंवर, पत्रकार कार्तिक लोखंडे, वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे किशोर भोयर आणि प्रवीण तडस यांचा समावेश आहे.ही समिती सोमवारी रात्री चंद्रपुरात दाखल झाली. समितीचा ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा नियोजित दौरा होता. मात्र, सोमवारी रात्री आलेल्या समितीने मंगळवारी दिवसभर सहलीप्रमाणे शहरातील काही भागांना भेटी दिल्या. बिनबा गेटच्या बाहेरील भाग, विठ्ठल मंदिर परिसरातील खिडकी, झरपट नदी, जटपुरा गेट, रामाळा तलाव, बाबुपेठ रेल्वे लाईन आणि जलनगरमधील हागणदारीमुक्त परिसराची पाहणी केली. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या गौतमनगर, जटपुरा गेट, महाकाली मंदिर आणि बुरडकर मोहल्ल्यातील सार्वजनिक शौचालयाचीसुद्धा पाहणी केली. तुकूममधील मातोश्री विद्यालय आणि महानगरपालिकेच्या दोन शाळांना भेटी देवून तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तत्पूर्वी सकाळी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत समितीची बैठक झाली. या बैठकीत मनपा प्रशासनाने साफसफाई आणि हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या कामाची प्रात्याक्षिके दाखविली.स्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय समितीने प्रात्यक्षिकावर भर न देता दोन दिवस सर्व भागांचा दौरा करून गुणांकन केले. मात्र राज्यस्तरीय तपासणी समितीने प्रत्यक्ष पाहणीवर अधिक भर न देता प्रात्यक्षिक पाहून समाधान मानले. मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दौरा आटोपून समितीने रात्रीचा मुक्काम बल्लारपुरात ठोकला. बुधवारी भल्या सकाळी समिती नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या दौऱ्यादरम्यान समितीने कोणकोणत्या भागांना भेटी दिल्या, तसेच काय अवलोकन केले, याबाबत समिती सदस्य काहीही बोलायला तयार नाही. सरकारला गोपनीय अहवाल सादर करायचा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)