शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

राज्यस्तरीय समिती करणार आदिवासींच्या जमिनीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:31 AM

राजुरा : राज्यातील आदिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या जमिनीच्या वहिवाटी, बिगर आदिवासी व्यक्तिंना अकृषिक कारणासाठी हस्तांतरित केलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय ...

राजुरा : राज्यातील आदिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या जमिनीच्या वहिवाटी, बिगर आदिवासी व्यक्तिंना अकृषिक कारणासाठी हस्तांतरित केलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी आमदार असताना राजुरा तालुक्यातील रामपूर येथील आदिवासी व्यक्तीच्या जमिनीच्या अनियमिततेबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी चौकशी करू, असे आश्वासन दिले होते. शासन निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील मागील दहा वर्षांत हस्तांतरण प्रकरणात माहिती गोळा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. चंद्रपूर, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी कोणत्या आधारावर विकल्या. याची खात्री करून समिती शासनास अहवाल सादर करणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून सहसचिव रमेश चव्हाण यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार यासंदर्भात परिपत्रक निर्गमित केले आहे.