शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

राज्य कर्मचारी रस्त्यावर

By admin | Updated: September 3, 2015 00:34 IST

शासनाकडे अनेकदा मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी करूनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे कामगार व राज्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

सुमारे पाच हजार कर्मचारी सहभागी : प्रलंबित मागण्या पूर्ण करांचंद्रपूर : शासनाकडे अनेकदा मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी करूनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे कामगार व राज्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बुधवारी देशव्यापी संपाला अनुसरून विदर्भ मजदूर काँग्रेससह विविध राज्य कर्मचारी संघटनांनी शासनाच्या या धोरणाविरोधात चंद्रपुरात मोर्चा काढला. सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या या मोर्चातील घोषणांमुळे चंद्रपूर दुमदुमले. शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा गेल्याने शहरातील वाहतूकही प्रभावित झाली.कामगारांना किमान वेतन १५ हजार रुपये मिळाले पाहिजे, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण थांबविणे, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे, कामगार कायद्यात विरोधी तरतुदी करू नये, शेतकऱ्यांवर अन्याय करणारा जमीन अधिग्रहण कायदा आणू नये, बेरोजगारी नष्ट करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न चर्चेद्वारे मार्गी लावणे, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करणे आदी मागण्यांसाठी या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र तथा राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. विदर्भ मजदूर काँग्रेसच्या मागण्यांमध्ये राशन पध्दती पुन्हा सुरू करावी, श्रम कायद्यातील कामगारविरोधी परिवर्तन रद्द करा, वाढत्या बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.दुपारी १२ वाजतापासून विविध संघटनांनी विविध जागेवरून मोर्चाला प्रारंभ केला. बहुतेक संघटनांनी गांधी चौकातून मोर्चाची सुरूवात केली. हा मोर्चा जयंत टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आझाद बागेतून काही संघटना मोर्चात सहभागी झाल्या. काही संघटनांनी कस्तुरबा मार्गाने मोर्चा काढला. हाही मोर्चा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सर्व संघटनामिळून सुमारे पाच हजार कर्मचारी व कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. महात्मा गांधी मार्ग आणि कस्तुरबा मार्गाने मोर्चा निघाल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा पोहचल्यानंतर प्रत्येक संघटनांनी आपले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)सहभागी संघटनामहसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, वित्त व लेखा गट ब संघटना, कोषागार कर्मचारी, वनविभाग कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी, भूविज्ञान आणि खनिकर्म कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी, मलेरिया कर्मचारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी, स्थानिक निधी कर्मचारी, विक्रीकर कर्मचारी, भूमी अभिलेख कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कास्ट्राईब कर्मचारी, आदिवासी विभाग कर्मचारी, प्राथमिक शिक्षक कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचारी, नर्सेस कर्मचारी, समाज कल्याण कर्मचारी व विदर्भ मजदूर काँग्रेस संघटना मोर्चात सहभागी झाले होते.