शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: March 22, 2017 00:50 IST

जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या ७२ जागांसाठी २२ मार्च बुधवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.

पोलीस मुख्यालयात चाचणी : ७२ जागांसाठी १५ हजार उमेदवार, पोलीस विभागाकडून चोख व्यवस्था चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या ७२ जागांसाठी २२ मार्च बुधवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. ७२ जागांसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी मंगळवारी पोलीस भरती मैदानावर स्वत: सर्व व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी यावेळी मैदानात ठिकठिकाणी लावण्यात आलेले व्हिडीओ कॅमेरे आणि त्याच्या चित्रीकरणाचा आढावा घेतला. बुधवारपासून भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशिवाय अन्य लोकांना प्रवेश बंदी राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी राहावी यासाठी पोलीस दलात नातेवाईक असणाऱ्या अधिकाऱ्यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवण्यापासून परीक्षेच्या सर्व प्रक्रियाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य गुप्त वार्ता व लाचलूचपत प्रतिबंधक विभागास लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अपात्र उमेदवारांना काही शंका असल्यास तत्काळ अपिलची सोय केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कागदपत्रांची पडताळणी सर्वात शेवटी ७२ जागेकरीता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज सादर केलेले असून त्यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवार आहेत. आधी शारिरीक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी व शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप असणार आहेत. या भरतीमधील एक विशेष असे की, उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी ही सर्वात शेवटी करण्यात येणार आहे. त्यामुळे कागदपत्राच्या पडताळणी करीता उमेदवारांना बराच वेळ रांगेत उभे राहून ताटकळत बसण्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच जे उमेदवार वेळेअभावी काही महत्वाचे कागदपत्र उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरतात. त्यांना सुध्दा आपले कागदपत्र सादर करण्यास पुरेसा अवधी प्राप्त होणार आहे. सकाळीच होणार मैदानी चाचणी अत्यंत पारदर्शी व शिस्तीमध्ये ही भरती प्रक्रिया राबवितानाच उमेदवारांची गैरसोय सुध्दा होऊ नये याकडे सुध्दा बारकाईने लक्ष पुरविण्यात आले आहे. उन्हाळयाचे दिवस असल्याने मैदानी चाचणी ही शक्यतो एकाच दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरुन लांबून आलेल्या उमेदवार हे त्याच दिवशी आपल्या घरी परत जाऊ शकतील व शहरात कुठे थांबावे, या प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागणार नाही. ज्या ट्रॅकवर उमेदवार १६०० मीटर करीता धावणार आहेत, त्या ट्रॅकची संपूर्ण डागडुजी करण्यात आली आहे.