शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

आतातरी शाळा सुरू करा हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST

चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा सुरू झाल्या नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव काही ...

चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा सुरू झाल्या नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

शाळा बंद असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोना नियमांचे पालन करून प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चितीत होणारा अन्याय दूर करावा, जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील बीडीएस प्रणाली तत्काळ सुरू करावी, सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या सर्वच पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी शंभर टक्के पदांना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यासंदर्भात नायब तहसीलदार एस. भांदककर, गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार यांच्या मार्फतीने शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे अमोल देठे, विलास बोबडे, सुनील टोंगे, विनोद बाळेकरमकर, छत्रपती राऊत, विलास खाडे, शंकर निखाडे, विनोद गौरकर, विलास मेश्राम, संदीप गराटे, सचिन जांभुळे आदी उपस्थित होते.

बाॅक्स

पालकांनी केले स्वागत

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने अद्यापही ठाेस निर्णय घेतला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आई-वडील शेतात जातात. त्यामुळे मुले दिवसभर इकडे तिकडे सारखे फिरतात. त्यामुळे आई-वडिलांना मुलांबाबत चिंता सतावत आहे. एकदाची शाळा सुरू झाल्यास मुले शाळेत सुरक्षित राहतील, असा त्यांना विश्वास आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला असून, यासंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. यामुळे पालकांनी शिक्षक परिषदेचे कौतुक केले आहे.