शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन प्रारंभ

By admin | Updated: November 8, 2016 01:00 IST

कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाळ तत्काळ नियमित करावा या मागणीसह काही महिन्यापूर्वी राज्यातील ग्रामसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपासले होते.

प्रलंबित मागण्या : जिल्हाभरात एल्गारचंद्रपूर : कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाळ तत्काळ नियमित करावा या मागणीसह काही महिन्यापूर्वी राज्यातील ग्रामसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपासले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी पुन्हा सोमवारपासून धरणे देऊन असहकार आंदोलन सुरू केले आहे.गोंडपिंपरी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीच्या आवारासमोर संपूर्ण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी एकत्र आले. धरणे व असहकार आंदोलन सुरू केले. ग्रामसेवकाच्या १५ मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची शासनाने पूर्तता करावी व ग्रामसेवकांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमवारच्या पंचायत समिती स्तरावरील आंदोलनानंतर ११ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन, १५ नोव्हेंबरला नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन, त्यानंतर १७ नोव्हेंबरला काम बंद आंदोलन व चाब्या प्रशासनाकडे सुपूर्द करणे आदी आंदोलनात चर्चा करण्यात आली. आंदोलनात तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सुखदेवे, प्रमोद भोयर, माधुरी लोखंडे, रसिका करडभुजे, दिलीप घडले, रामदास तेलकुमरे, हरिनाथ गुरनुले, उषा टेभुर्णे, हर्षवर्धन खोब्रागडे, ललिता काळे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते.बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनात उडी घेतली असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प केला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या समस्या व विविध कामे बंद झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लात आहे. या आदोलनात सहभागी झालेले ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी बल्लारपूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना बल्लारपूर शाखेचे अध्यक्ष एल.एन.वाघाडे, सचिव बी.एन. केवे, एल.वाय. पोवरे, ए.बी. पानसरे, गुरुदास देवगडे, गणेश कोकोडे, महेश मिलमिले, राजेश भानोसे, वी.वी. मानकर, प्रतापराव ढुमणे व शुभांगी रामटेके यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)