शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

आरटीओतून परवाने देणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवाहनधारकांना दिलासा : अटी-शर्तीचे करावे लागणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प पडले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वाहन परवान्याचे कामही बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. दरम्यान, आता शिकावू वाहनधारकांना परवाने देण्याच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे काही प्रमाणात हा, होईना दिलासा मिळाला आहे.परवाना देणे बंद असल्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या सर्वांची विचार करून प्रशासनाने काही अटी, शर्तींवर परवाना देणे, दुय्यम करणे आदी कामे तसेच वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे मागील २५ मार्चपासून बंद असलेली सर्व कामे आता सुरू झाली आहे. यासाठी नागरिकांना अपाईटमेंट घेऊन कामे करावी लागणार आहेत. ही कामे करताना काही अटी, नियम घालून देण्यात आले आहेत. यात दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, कीबोर्डचे निर्जंतुकीकरण करावे, अर्जदाराने मास्क आणि हॅण्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटायझरचा पुरेसा साठा ठेवावा, असे नियम यात देण्यात आले आहेत. चाचणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनावर केल्यास प्रत्येकवेळी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे सूचनांचे पालन करीत आरटीओ कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे.गर्दी टाळावी लागणारपरिवहन कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिलेल्या अटीनुसार कामे करावी लाहणार आहे. वाहन चालक परवाना देताना याकरिता कुठल्याही शिबिराची मात्र परवानगी देण्यात आली नाही.वाहनांना करावे लागणार सॅनिटाइजलॉकडाऊन कालावधीमध्ये शिकाऊ परवाना जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांच्या परवान्याची वैधता संपली आहे, अशांची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा अनुज्ञप्तीधारकांची तसेच पक्क्या अनुज्ञप्ती धारकांची कामे प्राधान्याने करावी, पक्की अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यापूर्वी वाहन सॅनिटाइज केले अथवा नाही याची खतरजमा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अनेकांनी भरले ऑनलाईन अर्जवाहन परवाना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले. अनेकांना तारीखही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर यामध्ये दुरुस्ती केली. आता पुन्हा त्याच उमेदवारांना नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे.