शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:26 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमी सजली : आंबेडकरी अनुयायांची दीक्षाभूमीवर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. बुद्ध तत्वज्ञानाला समाजमनात रूजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य बाबासाहेबांनी पूर्ण केले. या तत्वज्ञानातूनच जगात शांती नांदेल. असा आत्मविश्वास समाजमनात पेरण्यासाठी सोमवारपासून चंद्रपुरात ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामूहिक बुध्दवंदनेनंतर वाहन रॅलीचे जटपुरा गेट मार्गाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले.ही वाहन रॅली दीक्षाभूमीवर पोहचताच समारंभाचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. यावेळी धम्मध्वजाचे प्रतिक असलेले फुगे आकाशात सोडण्यात आले. भदंत ज्ञानज्योती महास्थवीर संघरामगिरी यांच्या हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना भदंत ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६२ वर्षांपूर्वी अभुतपूर्व क्रांती घडविली. विषमतेविरोधात लढा लढला. सनातनी व्यवस्थेविरुध्द समानतेचे बिगुल फुंकले. समाजबांधवांचे आध्यात्मिक व भौतिक जीवनमान सुधारण्यासाठी भगवान तथागत बुध्दांचा धम्म दिला. या सत्धम्माला धम्मभूमीवरून गतिमान करा. आजघडलीला जगभरात युध्दाचे सावट दिसून येत आहे. विश्वाला युध्दाची नाही तर बुध्दांच्या विचारांची गरज आहे. डॉ. आंबेडकरांना धम्मदीक्षेचा सोहळा पंढरपुरात घ्यावयाचा होता. मात्र बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्नेहसंबंधामुळे नागपूर व चंद्रपूर येथे धम्मदीक्षेचा समारंभ घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. जीवनात पंचशिलाचे पालन करायला पाहिजे. जीवन आनंदमय करण्यासाठी चिताची शुध्दी आवश्यक आहे. ही शुध्दी विपश्यनेद्वारे प्राप्त होते, असेही ते म्हणाले.आज मुख्य समारंभ१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. देवेंदर सिंग, उच्च शिक्षण नागपूर विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, डॉ. रतन लाल उपस्थित राहणार आहेत.