शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

करारनाम्यानंतरच बांधकाम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:42 IST

तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते.

ठळक मुद्देटॉवर प्रकरण : शेतकºयांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्याने शनिवारी ते बंद पाडण्यात आले होते. दरम्यान सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.नागरी येथील सबस्टेशनला वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतात टॉवर उभारले जात होते. मात्र, पॉवर ग्रीडने यासंदर्भात करारनामा केला नाही. प्रतिकार केल्यास शेतकºयांना दमदाटी केली जात होती. आज उपविभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामूळे नागरी येथील उपकेंद्राचे काम बंद करण्यात आले. संतप्त शेतकºयांनी टॉवर कंपन्यांचा निषेध करून करारनामा करण्याची मागणी केली.वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाºया शेतकºयांना प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकºयांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांनी केली. वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी आमदार बाळू धानोरकर, पॉवर ग्रीड कंपनीने अधिकारी, तहसीलदार सचिन गोसाई, कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थिीत होते. शेतकºयांचा वतीने आमदार बाळू धानोरकर यांनी भूिमका मांडली. शेतकºयांचे नुकसान होऊ नये, यासाठी पॉवर ग्रीड कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.बाळू धानोरकर यांनी या बैठकीत केली.-अन्यथा गुरूवारी आंदोलनशेतकºयांशी करारनामा न करता टॉवर उभारल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. मात्र, पॉवरग्रीड कंपनीने तोडगा काढला नाही. त्यामुळे गुरूवारी वरोरा येथील रत्नमाला चौकात रास्ता रोको आंदोलन आणि जाम तसेच नागरी येथील उपकेंद्रात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.