शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

तांदळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:35 IST

तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशोकसभेतील भावना शासनाने विचार करावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदनेत दादाजींच्या अंत्यविधीच्या वेळी शोकसभेत व्यक्त केल्या.दादाजी खोब्रागडे यांचा जन्म चिमूर तालुक्यातील एका आडवळणाच्या खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. परिस्थितीमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाही. कामाच्या शोधात त्यांचे वडील नांदेडला आले आणि ते येथील रहिवासी झाले. दादाजींची सुरूवातीपासूनच संशोधक वृत्ती. या वृत्तीतूनच त्यांनी आपल्या दीड एकर शेतीत धानाचे पीक घेत असताना १९८३ च्या काळात एचएमटी धानाचे वाण शोधून काढत ते विकसित केले.धानाच्या या एचएमटी वाणाने देशातील सर्व धान पिकाचे विक्रम मोडून काढले. एवढेच नव्हे तर विदेशातही या वाणाचे पीक घेतल्या जात आहे. दादाजींच्या संशोधनाची फोर्ब्स या जागतिक संस्थेने दखल घेतली व जगातील १० शक्तीशाली उद्योजकांच्या यादीत दादाजींना स्थान दिले. यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. दादाजींचे हे कार्य विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या संशोधकांनाही लाजवणारे आहे. मात्र महाराष्ट्रात दादाजींच्या संशोधनाची उपेक्षाच झाली आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या शोकसभेत उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रफुल्ल खापर्डे, वसंत वारजुकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे, बीआरएसपीचे राजू झोडे यांनीही दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दादाजींना एचएमटी या धानाच्या वाणाचे पेटंट मिळायला पाहिजे. दादाजीने आडवळनावरील एका खेड्यात राहून जे संशोधन केले, त्याला तोड नाही. या वाणाने अनेकांना श्रीमंती प्राप्त झाली. मात्र दादाजी शेवटपर्यंत जसा होता तसाच राहिला, असे विचार मांडले.घराची इच्छा अपूर्णएक वर्षापूर्वी ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, दादाजींनी पुरस्कारांच्या जतनाकरिता शासनाने एक छोटेसे घर बांधून द्यावे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशितही केले होते. परंतु त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :agricultureशेती