शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:35 IST

तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशोकसभेतील भावना शासनाने विचार करावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदनेत दादाजींच्या अंत्यविधीच्या वेळी शोकसभेत व्यक्त केल्या.दादाजी खोब्रागडे यांचा जन्म चिमूर तालुक्यातील एका आडवळणाच्या खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. परिस्थितीमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाही. कामाच्या शोधात त्यांचे वडील नांदेडला आले आणि ते येथील रहिवासी झाले. दादाजींची सुरूवातीपासूनच संशोधक वृत्ती. या वृत्तीतूनच त्यांनी आपल्या दीड एकर शेतीत धानाचे पीक घेत असताना १९८३ च्या काळात एचएमटी धानाचे वाण शोधून काढत ते विकसित केले.धानाच्या या एचएमटी वाणाने देशातील सर्व धान पिकाचे विक्रम मोडून काढले. एवढेच नव्हे तर विदेशातही या वाणाचे पीक घेतल्या जात आहे. दादाजींच्या संशोधनाची फोर्ब्स या जागतिक संस्थेने दखल घेतली व जगातील १० शक्तीशाली उद्योजकांच्या यादीत दादाजींना स्थान दिले. यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. दादाजींचे हे कार्य विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या संशोधकांनाही लाजवणारे आहे. मात्र महाराष्ट्रात दादाजींच्या संशोधनाची उपेक्षाच झाली आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या शोकसभेत उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रफुल्ल खापर्डे, वसंत वारजुकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे, बीआरएसपीचे राजू झोडे यांनीही दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दादाजींना एचएमटी या धानाच्या वाणाचे पेटंट मिळायला पाहिजे. दादाजीने आडवळनावरील एका खेड्यात राहून जे संशोधन केले, त्याला तोड नाही. या वाणाने अनेकांना श्रीमंती प्राप्त झाली. मात्र दादाजी शेवटपर्यंत जसा होता तसाच राहिला, असे विचार मांडले.घराची इच्छा अपूर्णएक वर्षापूर्वी ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, दादाजींनी पुरस्कारांच्या जतनाकरिता शासनाने एक छोटेसे घर बांधून द्यावे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशितही केले होते. परंतु त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :agricultureशेती