शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला हरताळ

By admin | Updated: November 18, 2014 22:52 IST

शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या

हरदोना : शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे हागणदारी मुक्त गाव संकल्पनेला ग्रामपंचायतींनीच हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे.राज्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावा यासाठी शासनाने हागणदारी मुक्त गावाची संकल्पना पुढे करीत योजनेला धडाक्यात प्रारंभ केला होता. शासनाने ही योजना यशस्वी करण्यासाठी हागणदारीमुक्त गावाला पुरस्कार देण्याची घोषणा केली. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने ही योजना आता नावापुरतीच उरली आहे.शासकीय अधिकारी कर्तव्यदक्ष नसले तर सरकारी योजनांची कशी वाट लागते याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. राजुरा तालुक्यातील गावांना भेट दिल्यानंतर गावाच्या प्रवेशद्वारापासून घाणीने माखलेले रस्ते पाहून नाकावर रूमाल धरल्याशिवाय पर्याय नसतो. गावातील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने व ग्रामपंचायतीने ही योजना गावकऱ्यांच्या सहकार्यातून यशस्वीपणे न राबविल्याने या योजनेला ग्रामपंचायतींनीच हरताळ फासले आहे. शासनाची योजना केवळ कागदोपत्रीच राबवून कागदावरच गावाचा विकास करायचा. मात्र प्रत्यक्षात गावात चित्र बघितले तर वास्तविकता वेगळीच असेच चित्र अनेक गावात आहे. हागणदारीमुक्त गावाची संकल्पना यशस्वी करताना ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांना त्या योजनेची पुरेपूर माहिती व पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र अनेक ग्रामपंचायतीचे कर्मचारी याला बगल देत माहिती देण्याचे टाळत असतात. त्यामुळे गावकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही.शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचविणाऱ्या व ग्रामस्तरावर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींनाच अखेरची घरघर लागली असून शासकीय योजना कागदोपत्री राबवून धन्यता मानण्यात पटाईत असलेले शासकीय कर्मचारीच चांगल्या योजनेला ग्रहण लावत आहेत. हागणदारी मुक्त गावाची संकल्पना आता धूसर झाली असून ग्रामपंचायतींनीच या योजनेला हरताळ फासला आहे. (वार्ताहर)