शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील त्या प्रोत्साहन भत्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST

चंद्रपूर : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना एसटी महामंडळाने मदतीचा हात देत विशेष बसफेऱ्या सुरु केल्या होत्या. ...

चंद्रपूर : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना एसटी महामंडळाने मदतीचा हात देत विशेष बसफेऱ्या सुरु केल्या होत्या. या बसवर कर्तव्यावर असणाऱ्या चालक वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता. मात्र आठ महिन्याचा कालावधी लोटूनही चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्याची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली होती. या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. लॉकडाऊन काळात चंद्रपूर शहरातून अनेक एसटी बसमधून परराज्यात जाणाऱ्या हजारो श्रमिकांकरिता सोडण्यात आली. या बसवर काम करणाऱ्या चालक व वाहकाला ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली होती. परंतु, अद्यापही या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. चंद्रपुरातून १५१ बसेस परराज्यात पाठविल्याची माहिती चंद्रपूर आगारातून मिळाली.

बॉक्स

वाहक चालक पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दहशतीत एसटी महामंडळाद्वारे सोडलेल्या बसफेऱ्यांमध्ये अनेक चालक व वाहकांनी प्रामाणिक सेवा बजावली. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही.

कोट

कोरोना संचारबंदी काळात सेवा बजावणाऱ्या प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. जिल्ह्याबाहेर माल वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसुद्धा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणीला एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणत्याही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. त्वरित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- दत्ता बावणे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, चंद्रपूर

त्यांच्या मूळ गावी पोहचवून देण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने विशेष बसेस सोडल्या होत्या. या बसवर चालक व वाहक म्हणून काम करणाऱ्या चालक व वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता.