लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर शहराला लॉकडाऊन केले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकही आता सतर्क झाले असून स्वंयस्फुर्तीने लॉकडाऊनला सहकार्य करीत असल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे, बहुतांश नागरिकांनी गुरुवारीच खरेदी करून शुक्रवारपासून घराबाहेर पडणे टाळल्याचे शहरात फेरफटका मारल्यानंतर बघायला मिळाले.जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढण्याची साखळी सोडण्यासाठी लॉकडाऊन ही उपाय योजना आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी डीप क्लिंनिंग मोहीम शहराच्या विविध भागात राबविण्यात आली. आठ प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने निजंर्तुकीकरण करण्यात येऊन असून फॉगिंग, फवारणी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे केली जात आहे.या घडामोडीं्वर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी लक्ष ठेऊन आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे यांच्या नियंत्रणात मनपाचे चारही सहायक आयुक्त धंनजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, विद्या पाटील यांनी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथकासह गुरुवारी पाहणी केली. जटपुरा गेट, वरोरा नाका, नागपूर मार्ग आदी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ते प्रत्येक वाहनांची तपासणी करीत होते. पेट्रोलपंपवर एकही वाहन येत नव्हते.
लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST
जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढण्याची साखळी सोडण्यासाठी लॉकडाऊन ही उपाय योजना आहे.
लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठळक मुद्देफेरफटका महानगराचा : पोलीस ताफा अत्यल्प असतानाही चंद्रपूरकरांनी पाळला लॉकडाऊनचा पहिला दिवस