शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:06 IST

चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : कामाच्या दर्जाचीही काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामांना वेग द्या आणि ही कामे उत्तमरित्या पूर्ण करताना त्याचा दर्जाही उत्तम राहील याची काळजी घ्या, अशा सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.चांदा ते बांदा योजनतील पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर या पॅटर्नप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही एकात्मिक आणि सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगून ना. मुनंगटीवार म्हणाले, या विभागांतर्गत राबविण्यात येणाºया एकात्मिक विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. योजनेतील कामांचे प्रशासकीय मंजुरीचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत. परंतु त्यांच्या तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव हे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी नियोजन विभागात थेट सादर करावेत. त्या प्रस्तावांना संबंधित विभागाकडून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्याची प्रक्रिया नियोजन विभागामार्फत समन्वयाने पूर्णत्वाला नेली जाईल. यामुळे प्रस्तावाच्या तांत्रिक मंजुरीसाठी वेळ कमी लागेल, असेही ते म्हणाले.चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राच्या दोन टोकांवरील खनिज आणि नैसर्गिक संपत्ती लाभलेले दोन जिल्हे आहेत. या संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करून जिल्ह्यांचा विकास करताना अधिकाधिक रोजगार निर्माण होऊन त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, जीवनमान सुधारावे, यासाठी योजनेतून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विविध शासकीय विभाग, जिल्ह्यात काम करू इच्छिणाºया खासगी कंपन्या, सामाजिक संस्था, सीएसआर फाऊंडेशन, खासगी गुंतवणूकदार, उद्योजक, जिल्ह्यातील उत्पादक, बचतगटाच्या समन्वयातून शाश्वत आर्थिक विकास साधण्याचे काम सुरू आहे.कृषी, फलोत्पादन आणि संलग्न सेवा, पर्यटन, पशुधन विकास, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय, उद्योग व खनिज विकास व संलग्न प्रक्रिया उद्योग, वने, वनोत्पादन व पर्यावरण, जलसंधारण, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन आणि कौशल्य विकास अशा काही या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून योजनेत उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. या सर्व क्षेत्रांच्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन करून करण्यात येणाºया कामांच्या संकल्पना व प्रगतीचे सादरीकरण पुढील बैठकीत करावे, असे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.कोषागार कार्यालयाचे काम लवकर पूर्ण कराराज्यातील सर्व कोषागार आणि उपकोषागार कार्यालयांचे आधुनिकीकरण करावे व चंद्रपूर कोषागार कार्यालयाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या. लेखा आणि कोषागारांच्या इमारतींसाठी एक उत्तम संकल्पना तयार कराव्यात, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.