शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: May 12, 2014 23:31 IST

मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक नुकसानीवर मात करत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या हंगामासाठी जोमाने कामाला लागला आहे.

चंद्रपूर : मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक नुकसानीवर मात करत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या हंगामासाठी जोमाने कामाला लागला आहे.

गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीन व तुरीचे पीक अपेक्षित प्रमाणात झाले नाही. तसेच कापसाच्या पिकातही मोठी घट झाल्याने हा तोटा दूर करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी गव्हाची पेरणी केली. मात्र अकाली पावसाने यावेळीही नुकसान केले.सध्या लग्नाचे मुहूर्त मोठय़ा प्रमाणात असल्याने शेतीकामासाठी योग्य सवड मिळणार नसल्याने आताच पेरणीपूर्व कामांना सुरूवात केली आहे. अशातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकर्‍यांनी नांगरणी, वखरणीच्या कामाला सुरूवात केली आहे. पावसाळा लागण्यासाठी अजून अवधी असला तरी, शेती यावर्षी लवकरच रिकामी झाली आहे. त्यामुळे शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

काळ बदलत चालला आहे. काळानुरूप शेती करण्याच्या पद्धतीतसुद्धा बदल होत आहे. मजुरीचे चढलेले दर, चार्‍याची वाढती टंचाई लक्षात घेता बैलद्वारे मशागत करण्यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर शेतकर्‍यांचा भर आहे. ट्रॅक्टरद्वारे कामाचा निपटारा लवकर पूर्ण होतो. आताच्या काळात बैलजोड्याही नावापुरत्याच उरल्या आहेत. वर्षभराचा खर्च, लग्नसमारंभ, आजारपण यावर होणार्‍या खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. मात्र, यंदा तरी चांगले पीक होईल. या आशेने शेतकरी कामाला लागला आहे. गतवर्षीच्या अतवृष्टी, महापूर व अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेला, बी-बियाणे, खते आदीसाठी पैशाची व्यवस्था कशी होईल, या विवंचनेत बळीराजा असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)