शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

हंगामपूर्व मशागतीला वेग

By admin | Updated: June 7, 2014 01:45 IST

aरामागील वर्षी अतवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीजा पुन्हा नव्या

आता प्रतीक्षा पावसाची : शेतातील लगबग वाढलीचंद्रपूर: रामागील वर्षी अतवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या  दाहकतेची पर्वा न करता शेतकर्‍यांची शेतातील लगबगही वाढली आहे. मशागतीपूर्व सर्वच कामे आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ प्रतीक्षा  पावसाची आहे.मागील वर्षी शेतकर्‍यांनी मोठय़ा उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी  मोठय़ा आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज नसताना पाऊस मुसळधार स्वरुपात अविरत पडतच राहिला.  जुलै, आगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा  दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५0 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक  शेतजमीन पार खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्येतलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप  हंगामात अनेकांना शेती  करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतवृष्टीची  नोंद शासनदरबारीही घेण्यात आली. मात्र शासनाची मदत शेतकर्‍यांचे अश्रू पुसू शकली नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा केला. ऐन पिक  कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकर्‍यांचे पीक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत  आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. सध्या सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे.  उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत.  यंदा कृषी  विभागाने  साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली  जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६0 हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन १ लाख ४0 हजार हेक्टर व सर्वात कमी  कापूस एक लाख १0 हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. बहुतांश शेतकर्‍यांची हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी आता  पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र यंदा वरूणराजा कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगू शकणार आहे.