शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

हंगामपूर्व मशागतीला वेग

By admin | Updated: June 7, 2014 01:45 IST

aरामागील वर्षी अतवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीजा पुन्हा नव्या

आता प्रतीक्षा पावसाची : शेतातील लगबग वाढलीचंद्रपूर: रामागील वर्षी अतवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या  दाहकतेची पर्वा न करता शेतकर्‍यांची शेतातील लगबगही वाढली आहे. मशागतीपूर्व सर्वच कामे आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ प्रतीक्षा  पावसाची आहे.मागील वर्षी शेतकर्‍यांनी मोठय़ा उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी  मोठय़ा आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज नसताना पाऊस मुसळधार स्वरुपात अविरत पडतच राहिला.  जुलै, आगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा  दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५0 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक  शेतजमीन पार खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्येतलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप  हंगामात अनेकांना शेती  करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतवृष्टीची  नोंद शासनदरबारीही घेण्यात आली. मात्र शासनाची मदत शेतकर्‍यांचे अश्रू पुसू शकली नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा केला. ऐन पिक  कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकर्‍यांचे पीक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत  आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. सध्या सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे.  उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत.  यंदा कृषी  विभागाने  साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली  जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६0 हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन १ लाख ४0 हजार हेक्टर व सर्वात कमी  कापूस एक लाख १0 हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. बहुतांश शेतकर्‍यांची हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी आता  पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र यंदा वरूणराजा कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगू शकणार आहे.