शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हंगामपूर्व मशागतीला वेग

By admin | Updated: June 5, 2016 00:36 IST

मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे.

आता प्रतीक्षा पावसाची : शेतातील लगबग वाढलीचंद्रपूर: मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे. मशागतीपूर्व सर्वच कामे आता अंतिम टप्प्यात असून आता केवळ प्रतीक्षा पावसाची आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपला लहरीपणा दाखविणे सुरू केले. जुलै, आॅगस्ट महिने म्हणजे खरे पावसाचे महिने म्हटले जाते. मात्र यावेळीही पावसाने आपली अवकृपाच दाखविली. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. नदी-नाल्यांमध्येही पाहिजे तसा पाऊस पडू शकला नाही. मागील वर्षी आपली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली होती. सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा होता. तरीही भगीरथ प्रयत्न करून शेतकऱ्यांनी कसेबसे आपले पिक वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज उचलून हंगाम केला होता. मात्र उत्पादन कमी आल्याने लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे कर्ज फेडायचे की कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, या विवंचनेत शेतकरी वर्षभर राहिला. निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. सध्या सुर्याचा पारा ४६.८ अंशापार गेला आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. हंगामपूर्व मशागतीला आता चांगलाच वेग आला आहे. बि-बियाण्यांची व खतांची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे. यंदातरी पावसाने साथ सोडू नये आणि अतिरेकही करू नये, यासाठी साकडे घातले जात आहे. एकूणच आता शेतकऱ्यांनाही पावसाचीच प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)४ लाख ६७ हेक्टर लागवडी क्षेत्रयंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र यंदा वरूणराजा शेतकऱ्यांवर कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगू शकणार आहे. रबी पिकांचेही झाले नुकसानमागील खरीप हंगामात तर निसर्गाने दगा दिलाच. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादन आले. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला. अत्यल्प पावसामुळे सिंचनाचा प्रश्न उदभवणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली नाही. काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी केली. मात्र ऐन पीक हाती येण्याच्या वेळेवर अकाली पावसाने तांडव केले. चार ते पाच वेळा वादळी वारा व गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी असतानाही शासनाने याकडे लक्ष दिले नाही.पुन्हा कर्जाचे ओझेमागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. कर्ज डोक्यावर घेऊन पुन्हा शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहे. पुन्हा सावकराच्या दारात शेतकरी उभा ठाकला आहे. कर्जाचे ओझे यावेळी आणखी वाढणार आहे.