शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गुन्हेगारीला अंकुश घालण्यासाठी विशेष पथक तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

चंद्रपूर : चंद्रपूर हा शांतप्रिय जिल्हा अशी ओळख असताना गुन्हेगारी व अवैध व्यवसायात वाढ झाली. हत्याकांड, ...

चंद्रपूर : चंद्रपूर हा शांतप्रिय जिल्हा अशी ओळख असताना गुन्हेगारी व अवैध व्यवसायात वाढ झाली. हत्याकांड, दारू व रेती तस्करी सर्रास सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथक तयार करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे भेटीदरम्यान केली.

यावेळी माजी आमदार ॲड. संजय धोटे, अरुण मस्की, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, विनायक देशमुख, दिलीप वांढरे, गौतम यादव उपस्थित होते. राजुरा येथे राजू यादव या कोळसा वाहतूकदाराची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. काही महिन्यापूर्वी सूरज बहुरिया नामक व्यक्तीवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मनोज अधिकारी यांची हत्या झाली, अशा दुर्दैवी घटना सलग घडत असताना गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे. माजरी, नांदा फाटा, बल्लारशा, राजुरा-सास्ती, दुर्गापूर या ठिकाणी बाहेर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी गुन्हेगारीचा हैदोस घातला, याकडेही माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी लक्ष वेधले. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात वाढलेली गुन्हेगारी व नागरिकांमधील दहशतीबद्दल खंत व्यक्त केली.