शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व तुरीचा पेरा वाढणार तर सोयाबीनचा घटणार

By admin | Updated: June 3, 2015 01:33 IST

आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी शेताची मशागत करुन तयारी करीत आहेत. कृषी विभागही रब्बी व खरीप हंगामाकरिता सज्ज झाला आहे.

वरोरा : आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी शेताची मशागत करुन तयारी करीत आहेत. कृषी विभागही रब्बी व खरीप हंगामाकरिता सज्ज झाला आहे. यावर्षी कपाशी व तुरीच्या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सोयाबीन पिकाच्या पेऱ्याची घट होणार असल्याचे मानले जात आहे. वरोरा तालुक्यात कापूस, सोयाबिन, तूर, भात ही मुख्य पिके मानली जातात. त्यातच सोयाबिन व कापूस या दोन रोखीच्या पिकांना शेतकरी प्राधान्य देत असतात. मागील वर्षी कापूस ३३ हजार हेक्टर, सोयाबिन २० हजार हेक्टर, तर तूर ६ हजार हेक्टर व भात १९०० हेक्टर मध्ये शेतकऱ्यांनी लागवड केली होती. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात वाढ होवून ३४ हजार २०० हेक्टर, सोयाबीनच्या पेऱ्यात मागील वर्षीच्या तुलनेत घट होऊन यावर्षी १८ हजार ७०० हेक्टर तर तुरीच्या पेऱ्यात वाढ होऊन ९ हजार ३५० हेक्टर मध्ये पेरणी करण्यात येणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मागील वर्षी सोयाबिन बियानाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक केली. उगवत क्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या मस्तकी मारले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनची होळी करावी लागली. काहींना अत्यल्प उत्पादन झाले. दरही घसरले, त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला होता. मागील हंगामाच्या सुरवातीला पावसाने उघड झाप सुरु ठेवल्याने कपाशीच्या बियाणाची एकदा नव्हे तर तीनदा लागवड करावी लागली. त्यानंतरही शासनाने हमी भाव ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल घोषित करुनही तो भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता नव्या जोमाने शेती करण्यासाठी लगबग सुरू करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)रासायनिक खतांची मागणी वाढलीमागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन व्हावे याकरिता रासायनिक खत व किटकनाशकाची फवारणी पिकावर करणे सुरु केले आहे. मागील वर्षी १२ हजार मेट्रिक खत रासायनिक खताची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी १५ हजार ४० मेट्रिक टन रासायनिक खत लागणार आहे. यामध्ये युरिया खताला सर्वाधिक मागणी आहे.बियाण्यांकरिता कृषी विभाग सज्ज शेतकरी यावर्षी कापूस, तूर, भात व सोयाबीन या बियाणांची मागणी करणार असल्याने कृषी विभागाने आपले नियोजन बियाणांची मागणी करुन ठेवली आहे. बियाणांचा ऐन हंगामात काळाबाजार होणार नाही याकरिता कृषी विभागाने उपाय योजना राबविणे सुरु केले आहे. सोयाबीन १८ हजार ७०० क्विंटल बियाने, भात ७५० क्विंटल, तुरी २०० क्विंटल तर कापूस १ लाख ४५ हजार पाकिटे बियाणे लागणार आहे.कापूस व सोयाबीन पीक मागील कित्येक वर्षापासून शेतकरी घेत आहे. मागील वर्षी सोयाबीनचा मोडा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतात तुरीची पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी दोन बाय पाच आकारात टोवन पद्धतीने तुरी लावल्याने वातावरण चांगले नसूनही तुरी पिकावर रोग आला नाही उत्पादन चांगले झाले तर भावही प्रती क्विंटल सात हजार मिळाल्याने यावर्षी शेतकरी तूर पिकाची शेती मोठ्या प्रमाणात करतील, असा अंदाज आहे.- गजानन हटवार, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वरोरा