शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: November 7, 2015 00:44 IST

नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे.

प्रतिएकर दीड क्विंटलचे उत्पादन : बळीराजाची दिवाळी अंधारात जाणारगोंडपिंपरी : नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने विदर्भात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कधीकाळी एकरात सहा ते आठ क्विंटलचे उत्पन्न घेणाऱ्या बळीराजाच्या पदरी यावेळेस एक- दोन क्विंटल सोयाबीन हाती आले आहे. फायदा तर सोडा, उत्पादन खर्चही न निघाल्याने बळीराजापुढे मोठे संकट उभे आहे.दिवाळी साजरी करण्याच्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे बघितले जाते. साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीत निघणारे सोयाबीन बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देत होते. दिवाळीच्या आधी हे पीक निघत असल्याने यावर त्यांची दिवाळी अवलंबून असायची. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या स्थितीत याच पिकाने बळीराजाला मोठा आधार दिला. एकरी सहा ते सात क्विंटल असा सोयाबीनचा सरासरी फेरा होता. काही शेतकऱ्यांनी तर एकरी नऊ क्विंटल एवढे उत्पादन घेतले आहे.यावेळी मात्र उलटेच घडले. ऐनवेळी पावसाने पाठ फिरविली. ऐन पिकाच्या भरणीच्या मोसमात पावसाने दडी मारल्याने दाण्यांची भरणी झाली नाही. शेंगा न भरल्याने सोयाबीनचा दाणा बारीक आला. ज्या शेतात एकरी सहा ते सात क्विंटल सोयाबीन व्हायचे, तिथे केवळ एक ते दोनच क्विंटल सोयाबीन हाती आले. त्यामुळे सोयाबीनसोबत असणारी बळीराजाची स्वप्नेही भंगली. विदर्भातील विशेषत: पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. दोन महिन्यांत निघणाऱ्या पिकाला नगदी पीक म्हणून शेतकरीबांधव पसंतीही देतात. मात्र यावेळेस सोयाबीनचे गणितच बिघडले. सध्या सोयाबिनला बाजारात ३३०० ते ३४०० एवढा बाजारभाव आहे. एका एकरात एक सोयाबीन बॅगची पेरणी केल्यापासून तो निघेपर्यंत साधारणत: सात ते साडेसात हजार रुपये खर्च येतो. अशात एकरात एक ते दोन क्विंटल सोयाबिन निघालेल्या बळीराजाची खस्ता हालत आहे. उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. बाजार समित्यांतही सोयाबिनची आवक कमी झाली आहे. कृषी विभागानेही पीक कापणी निष्कर्षातून हेक्टरी चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाल्याचा शेरा दिलेला आहे. वातावरणातील असंतुलन, कमी पर्जन्यमान व कीडरोग आल्याने सोयाबीनच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली असल्याचे विदारक चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)