शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: November 7, 2015 00:44 IST

नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे.

प्रतिएकर दीड क्विंटलचे उत्पादन : बळीराजाची दिवाळी अंधारात जाणारगोंडपिंपरी : नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने विदर्भात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कधीकाळी एकरात सहा ते आठ क्विंटलचे उत्पन्न घेणाऱ्या बळीराजाच्या पदरी यावेळेस एक- दोन क्विंटल सोयाबीन हाती आले आहे. फायदा तर सोडा, उत्पादन खर्चही न निघाल्याने बळीराजापुढे मोठे संकट उभे आहे.दिवाळी साजरी करण्याच्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे बघितले जाते. साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीत निघणारे सोयाबीन बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देत होते. दिवाळीच्या आधी हे पीक निघत असल्याने यावर त्यांची दिवाळी अवलंबून असायची. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या स्थितीत याच पिकाने बळीराजाला मोठा आधार दिला. एकरी सहा ते सात क्विंटल असा सोयाबीनचा सरासरी फेरा होता. काही शेतकऱ्यांनी तर एकरी नऊ क्विंटल एवढे उत्पादन घेतले आहे.यावेळी मात्र उलटेच घडले. ऐनवेळी पावसाने पाठ फिरविली. ऐन पिकाच्या भरणीच्या मोसमात पावसाने दडी मारल्याने दाण्यांची भरणी झाली नाही. शेंगा न भरल्याने सोयाबीनचा दाणा बारीक आला. ज्या शेतात एकरी सहा ते सात क्विंटल सोयाबीन व्हायचे, तिथे केवळ एक ते दोनच क्विंटल सोयाबीन हाती आले. त्यामुळे सोयाबीनसोबत असणारी बळीराजाची स्वप्नेही भंगली. विदर्भातील विशेषत: पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. दोन महिन्यांत निघणाऱ्या पिकाला नगदी पीक म्हणून शेतकरीबांधव पसंतीही देतात. मात्र यावेळेस सोयाबीनचे गणितच बिघडले. सध्या सोयाबिनला बाजारात ३३०० ते ३४०० एवढा बाजारभाव आहे. एका एकरात एक सोयाबीन बॅगची पेरणी केल्यापासून तो निघेपर्यंत साधारणत: सात ते साडेसात हजार रुपये खर्च येतो. अशात एकरात एक ते दोन क्विंटल सोयाबिन निघालेल्या बळीराजाची खस्ता हालत आहे. उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. बाजार समित्यांतही सोयाबिनची आवक कमी झाली आहे. कृषी विभागानेही पीक कापणी निष्कर्षातून हेक्टरी चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाल्याचा शेरा दिलेला आहे. वातावरणातील असंतुलन, कमी पर्जन्यमान व कीडरोग आल्याने सोयाबीनच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली असल्याचे विदारक चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)