शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

चिमूर तालुक्यात हजारो हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी

By admin | Updated: October 21, 2014 22:49 IST

जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे.

खडसंगी : जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे. मात्र, खरीप पिकाची भरपाई रब्बी पिकातून काढण्याच्या तयारीला सद्या शेतकरी लागला असून रब्बी पिकाच्या मशागतीला सुरुवात केल्याचे चित्र चिमूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यावर्षी खरीप हंगामाला पावसाने सुरुवातीला चांगलाच दगा दिल्याने जुलैपर्यंत सोयाबीन व कापसाच्या अत्यल्प पेरण्या झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमधील पावसामुळे खरीपातील सोयाबीन व कापूस ६५ ते ७० टक्के पेरण्या झाल्या. सद्या तालुक्यात रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू झाली आहे. मागील महिन्यात काही गावात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सुखावले. चिमूर तालुक्यात रब्बीची सर्वाधिक पेरणी खडसंगी, आमडी, भिसी, शंकरपूर, बोथली, महालगाव या गावात जास्त प्रमाणात करण्यात येते. कृषी विभागाने देखील खरीपातील कमी पेरण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी पिकासाठी जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे नियोजन केले आहे. तालुक्यात रब्बीच्या गहू, चना, लाख पेरणीसाठी जमीन तयार झाल्या असून अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीप पिकाची काढणी उखरताच आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पेरणीला मोठ्या प्रमाणत वेग येणार आहे.यावर्षात वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने शेततळे, तलावात पाण्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या चिंतेत आहे. तालुक्यात सिंचनाच्या कुठल्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई या रब्बी हंगामात काढण्याच्या आशेवर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मशागतीचे कामे करीत आहेत. मात्र या विंवचनेतून निघण्यासाठी सद्या शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावरच अवलंबून असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. (वार्ताहर)