शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधूनच पेरणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यम कालावधीचे बियाणे फायदेशीर ठरते.

ठळक मुद्देउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अधिकाधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कमी आणि मध्यम कालावधीचे म्हणजेच १२० ते १२५ दिवसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करावी तसेच जमिनीचा व पाण्याचा समतोल साधून शेतकऱ्यांनी पेरणी करीत आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतरी सध्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुकापातळीवर जनजागृती सुरू केली आहे.मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यम कालावधीचे बियाणे फायदेशीर ठरते. ऑक्टोबर महिन्यात जमिनीत जास्त ओलावा राहत असल्याने रब्बी पिकाच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ होते. धानपीक लागवड करताना श्री पद्धत, सगुना व पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. भात पिकासोबतच शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तूर, सोयाबिन, मका, कापूस, मुंग, उडीद अशा पिकांची लागवड केल्यास जमिनीचा पोत सुधारुन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. शेतकऱ्यांनी घरच्याघरी बीज प्रक्रिया करुन बियाणे खरेदीसाठी होणाऱ्या खर्चात बचत करावी, बियाणे खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनात तीन टक्के मिठाच्या द्रावणाची व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही भातपिकासाठी करावी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. यासाठी कृषी सहायकांमार्फत मागदर्शन केले जात आहे. गावातील नोंदणीकृत गटामार्फत शेतकऱ्यांना एकत्रित खतांची व पाण्याची एकत्रित मागणी केल्यास शेतकऱ्यांना कृषी केंद्र व शेतकरी बचत गटामार्फत बियाणे पोहचविले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य बियाणांची लागवड करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.बियाणे खरेदी करताना काळजी घ्याकोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय, हे बघून पिकाची पद्धत ठरवावी, सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा, अशा सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी परवाना धारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाण्याबाबत संपूर्ण तपशिल असलेले उदा. पिक वाण, लेबल, नंबर,परवाना तपासणीचा दिनांक, मुदत, बियाणे किंमत, खरेदीदारांचे उत्पादकाचे, विक्रेत्यांचे नाव तसेच विक्रेत्यांची सही, रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.

टॅग्स :agricultureशेती