शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

घरकूल यादीचा घोळ निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली.

ठळक मुद्दे२३२ लाभार्थ्यांना दिलासा : लाभार्थ्यांची नावे मूळ गावात समाविष्ट

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ऑगष्ट २०१६ रोजी घरकूल यादीमध्ये प्रशासकीय पातळीवर झालेली घोडचूक अखेर दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे तालुक्याच्या १२ गावांतील २३२ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी ‘लोकमत’ ने हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (ग्रामीण) घरकूल यादी बनविताना प्रशासकीय पातळीवर झालेली चूक तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना चांगलीच भोवली होती. एका गावातील नावे दुसऱ्या गावात गेल्याने २३२ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले होते. हा प्रकार तालुक्यातील १२ गावांमध्ये घडला होता. ऑगष्ट २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल लाभार्थ्यांची निवड यादी बनविण्यात आली. मंजुरीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आली. मात्र यादी बनविताना प्रशासनाने काळजी न घेतली नाही. त्यामुळे १२ गावातील २३२ लाभार्थ्यांना ही चुक भोवली. यादी दुरूस्त करण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू होती. अखेर ‘लोकमत’ च्या पाठपुराव्यामुळे गुरूवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ गावांपैकी १९ गावातील हा प्रश्न निकाली निघाला होता. येत्या चार पाच दिवसात सर्वच गावांची समस्या दूर होणार आहे.प्रशासन झाले जागेप्रशासनाकडून घरकूल यादीत घोळ निर्माण केल्याने पात्र नागरिकांवर अन्याय झाला होता. लोकमतने सुरूवातीपासून हा प्रश्न लावून धरल्याने प्रशासन जागे झाले. त्यामुळे चुकी दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पात्र कुटुंब घरकूलपासून वंचितशंकरपूर : खैरी येथील संजय शंकर नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल योजनेच्या शासनाच्या प्रपत्र ब मध्ये आहे. परंतु पंचायत समितीच्या चुकीने घरकूलपासून वंचित राहावे लागत आहे. संजय नांदेकर हे अनेक वर्षांपासून घरकूलसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. नांदेकर यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत सन २०१६ च्या पात्र यादीत आले होते. मात्र, घरकूलचा लाभ मिळाला नाही. सदर व्यक्तीचे नाव चुकीने वगळण्यात आले. नाव यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुशील गंत्रटवार यांनी दिली.लाभार्थ्यांची नावे मूळ गावांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी संंबंधित गावाच्या ग्रामसभेचा ठराव मागण्यात आला होता. राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सहकार्याने आतापर्यंत १९ गावांचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तीन-चार दिवसात उर्वरित गावांचाही प्रश्न लवकरच सुटणार आहे.- प्रणव बक्षी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जि. ग्रा.वि.यंत्रणा चंद्रपूरपात्र कुटुंबांवर अन्याय होऊ नये, यासाठी 'लोकमत' ने हा प्रश्न सातत्याने उचलून धरला. जि. प. मध्ये मी यावर चर्चा घडवून आणली. ही समस्या आता दूर होणार असल्याने याचा आनंद आहे.- संजय गजपुरे, जि.प.सदस्य पारडी-मिंडाळा.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना